अनप्रिडिक्टेबल पवार !
मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेले राज्यातील जे थोडे बहुत राजकारणी आहेत त्यात सर्वात जेष्ठ असा मान असणारे आहेत ते म्हणजे शरद पवार,1967 सालापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे शरद पवार.आमदार पदापासून ते केंद्रात मंत्रीपदापर्यंत सर्व पदांचा अनुभव घेणाऱ्या या लोकनेत्याला आजही एकच सल असेल ती म्हणजे देशाचे पंतप्रधान पद त्यांना मिळू शकले नाही.अडीच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचा देशपातळीवर उदय झाल्यानंतर पासून काहीशे अस्वस्थ असणाऱ्या पवारांनी सध्या राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष घातले असल्याचे दिसते,सध्याचे राजकीय वातावरण पाहता पवारांनी बुद्धिबळाचा डाव मांडून ठेवलाय यात त्यांची चाल यशस्वी होते की पुन्हा एकदा त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एक मात्र नक्की आहे की पवारांनी डाव टाकला असून ते सत्ताधार्यांना चितपट करण्यासाठी कामाला लागले आहेत.
घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीने शरद पवार 1985 ते 2014 पर्यंत अनेकवेळा केंद्रीय राजकारणात गेले मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा ते राज्यात परत आल्याचा इतिहास आहे,वसंत दादांच्या सरकारला हादरा देऊन पवारांनी केलेला पुलोद चा प्रयोग असो की 1987 मध्ये केलेले बंड असो शरद पवार इज ए अन प्रिडिक्टेबल पॉलिटीशियन असं आजही म्हटलं जातं.
पवारांना जे अगदी जवळून ओळखतात ते आजही त्यांच्या मनात काय सुरु आहे,ते कधी काय करतील,कधी कोणाचा गेम (राजकीय) हे सांगता येत नाही असं म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तिनपेक्षा अधिक वेळा विराजमान होण्याचा मान जसा पवारांना आहे तसाच काँग्रेस ला देखील अनेकवेळा आस्मान दाखवण्याचा मान हि त्यांनाच आहे.पवारांनी वेळोवेळी काँग्रेस विरुद्ध बंड करून आपलेच हित साधल्याचा त्यांच्यावर आरोप होतो तो काही अंशी खरा देखील आहे.1978 चा पुलोद चा प्रयोग असो की 1987 मधील एस काँग्रेस चा विषय,पवारांनी प्रत्येक वेळी आपल्या पदरात काय पडते याकडेच लक्ष दिल्याचे दिसते .
1999 साली पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादीची स्थापना केली मात्र लगेच राज्यात काँग्रेस बरोबर आघाडी करीत सत्तेचा सोपान चढला,लगोलग त्यांनी केंद्रात देखील आपल्याकडे मंत्रिपद घेण्यात यश मिळवले.
शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात अनेकांना पद दिली,मानसन्मान दिला,लक्ष्मण माने असोत कि लक्ष्मण ढोबळे किंवा ना धो महानोर अथवा जनार्दन वाघमारे अशा कितीतरी अभ्यासू,हुशार लोकांना त्यांनी सभागृहाचा मार्ग दाखवला,शेती असो की सहकार या क्षेत्रात पवारांनी आभाळाएव्हढं काम करून ठेवल आहे हे नक्की .सहकार चळवळीचा पाया भक्कमपणे राज्यात विस्तार करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे याबाबत कोणी शंका घेणार नाही,दीर्घकाळ सत्तेत राहिल्याचाही हा परिपाक असू शकतो मात्र त्यालाही दानत लागते जी पवारांमध्ये निश्चित आहे हे नक्की .
शरद पवार यांनी एखाद्याचे तोंड भरून कौतुक केले किंवा एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचा कार्यक्रम झाला असे लोक चेष्टेने म्हणतात ,कदाचित ते पवार यांच्या न समजणाऱ्या स्वभावामुळे असावं .कारण पवार कधी कोठे कसा कोणाचा गेम करतील ते सांगणे कठीण आहे .एकीकडे भाजप च्या विरोधात दंड थोपटणारे पवार बारामती मध्ये नरेंद्र मोदींना पायघड्या घालताना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ,अनेकांनी तेव्हा पवार यांचा आता थेट राष्ट्रपती पदावर डोळा असल्याचं म्हटलं होत . पवार सत्तेत असोत कि नसोत त्यांचा शब्द अंतिम असतो हे अनेकांनी अनुभवले आहे .मात्र हेच पवार फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाहीत असा देखील अनेकांचा अनुभव आहे .
शरद पवार हे अजातशत्रू नेतृत्व आहेत हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे,राज्याच्या बाहेर हि त्यांनी देवेगौडा असोत कि ममता अथवा लालू प्रसाद यादव किंवा नितीशकुमार यांच्याशी कायम सख्य ठेवले आहे त्यामुळेच केंद्राच्या राजकारणात त्यांचा कायम दबदबा राहिलेला आहे,पवार यांनी राज्यात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्रीचे बंध कायम जपले आहेत हे सर्वश्रुत आहे .एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेह जपणारे पवार हे त्याचं वेळी नागपुरात जाऊन नितीन गडकरी यांच्याशी देखील मैत्री जपताना महाराष्ट्राने पाहिले आहे .त्यामुळे पवार कोणाशी कधी कसे वागतील आणि कोणाशी त्यांची मैत्री जमेल याबाबत सांगणे कठीण आहे . " एक बार उपर वाले के दिल में क्या है यह बताया जा सकता है किंतु पवार साहब के दिल में क्या है यह बताना मुश्किल है " असं जाणकार म्हणतात .ते अगदी खरं आहे .
गेल्या दोन वर्षात राज्यातील देवेंद्र सरकार चा कारभार पाहता काय करावे हा यक्ष प्रश्न पडलेले पवार मध्येच पेशवे आणि छत्रपती यांच्याबाबत बोलून राजकारणात काही घडते का याचा अंदाज घेताना दिसतात तर मध्येच राज्यभर निघणारे मराठा मोर्चे हे सरकार विरोधातील असंतोष असल्याचे सांगून सरकार ला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात .
पाऊणशे वयोमान पार केलेल्या पवारांना हे बोलण्याची किंवा राज्यात पुन्हा लक्ष घालण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडू शकतो मात्र उत्तर एकच आहे की " पवार पावर कर बिना नही रह सकते ".ऍट्रॉसिटी रद्द करा म्हणून बोलणारे पवार दुसऱ्याच दिवशी त्यात सुधारणा करण्याचा यू टर्न घेताना दलित समाज आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेताना दिसतात . पूर्वी छत्रपती पेशव्यांना जहागिऱ्या वाटायचे आज उलटे होत आहे हे त्यांचे भाष्य असो की भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे हे वक्तव्य यातून पवारांना राज्यातील सत्तेवरून देवेंद्र फडणवीस यांना हटवायचे आहे हेच दिसून येते.
कोपर्डी च्या घटनेच्या पार्षवभूमीवर निघणाऱ्या मराठा मोर्चाचे पवारांनी समर्थन करताना सरकार अडचणीत कसे सापडेल याची पुरेपूर काळजी घेतली मात्र त्याच वेळी दलित आणि ओबीसी समाजाने देखील आपल्या अस्तित्वासाठी मोर्चे काढल्याने पवारांचा प्लॅन (राजकीय लाभ घेण्याचा ) फसल्याचे चित्र आहे .
राज्यात पूर्वीपासून मराठा समाजाचे स्व शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक मराठा नेते झाले ,आहेत मात्र महाराष्ट्र आणि मराठा समाज म्हटलं की शरद पवार यांचेच नाव समोर येते .त्याच शरद पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे,सारीपाटाचा डाव टाकला आहे आता त्यात ते कोणत्या प्याद्याचा वापर करून कोणत्या नेत्याला अडचणीत आणतात कि पुन्हा एकदा नवा डाव मांडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
एकवेळ सागराचा तळ समजू शकतो किंवा आभाळाची उंची मोजता येईल मात्र शरद पवार यांच्या मनाचा थांग पत्ता लागणे कठीण आहे अशा या महान व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया रिपोर्टर ,बीड
9422744404
मागील पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव असलेले राज्यातील जे थोडे बहुत राजकारणी आहेत त्यात सर्वात जेष्ठ असा मान असणारे आहेत ते म्हणजे शरद पवार,1967 सालापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले नाव म्हणजे शरद पवार.आमदार पदापासून ते केंद्रात मंत्रीपदापर्यंत सर्व पदांचा अनुभव घेणाऱ्या या लोकनेत्याला आजही एकच सल असेल ती म्हणजे देशाचे पंतप्रधान पद त्यांना मिळू शकले नाही.अडीच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचा देशपातळीवर उदय झाल्यानंतर पासून काहीशे अस्वस्थ असणाऱ्या पवारांनी सध्या राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष घातले असल्याचे दिसते,सध्याचे राजकीय वातावरण पाहता पवारांनी बुद्धिबळाचा डाव मांडून ठेवलाय यात त्यांची चाल यशस्वी होते की पुन्हा एकदा त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एक मात्र नक्की आहे की पवारांनी डाव टाकला असून ते सत्ताधार्यांना चितपट करण्यासाठी कामाला लागले आहेत.
घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीने शरद पवार 1985 ते 2014 पर्यंत अनेकवेळा केंद्रीय राजकारणात गेले मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा ते राज्यात परत आल्याचा इतिहास आहे,वसंत दादांच्या सरकारला हादरा देऊन पवारांनी केलेला पुलोद चा प्रयोग असो की 1987 मध्ये केलेले बंड असो शरद पवार इज ए अन प्रिडिक्टेबल पॉलिटीशियन असं आजही म्हटलं जातं.
पवारांना जे अगदी जवळून ओळखतात ते आजही त्यांच्या मनात काय सुरु आहे,ते कधी काय करतील,कधी कोणाचा गेम (राजकीय) हे सांगता येत नाही असं म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तिनपेक्षा अधिक वेळा विराजमान होण्याचा मान जसा पवारांना आहे तसाच काँग्रेस ला देखील अनेकवेळा आस्मान दाखवण्याचा मान हि त्यांनाच आहे.पवारांनी वेळोवेळी काँग्रेस विरुद्ध बंड करून आपलेच हित साधल्याचा त्यांच्यावर आरोप होतो तो काही अंशी खरा देखील आहे.1978 चा पुलोद चा प्रयोग असो की 1987 मधील एस काँग्रेस चा विषय,पवारांनी प्रत्येक वेळी आपल्या पदरात काय पडते याकडेच लक्ष दिल्याचे दिसते .
1999 साली पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादीची स्थापना केली मात्र लगेच राज्यात काँग्रेस बरोबर आघाडी करीत सत्तेचा सोपान चढला,लगोलग त्यांनी केंद्रात देखील आपल्याकडे मंत्रिपद घेण्यात यश मिळवले.
शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात अनेकांना पद दिली,मानसन्मान दिला,लक्ष्मण माने असोत कि लक्ष्मण ढोबळे किंवा ना धो महानोर अथवा जनार्दन वाघमारे अशा कितीतरी अभ्यासू,हुशार लोकांना त्यांनी सभागृहाचा मार्ग दाखवला,शेती असो की सहकार या क्षेत्रात पवारांनी आभाळाएव्हढं काम करून ठेवल आहे हे नक्की .सहकार चळवळीचा पाया भक्कमपणे राज्यात विस्तार करण्यात पवारांचा सिंहाचा वाटा आहे याबाबत कोणी शंका घेणार नाही,दीर्घकाळ सत्तेत राहिल्याचाही हा परिपाक असू शकतो मात्र त्यालाही दानत लागते जी पवारांमध्ये निश्चित आहे हे नक्की .
शरद पवार यांनी एखाद्याचे तोंड भरून कौतुक केले किंवा एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचा कार्यक्रम झाला असे लोक चेष्टेने म्हणतात ,कदाचित ते पवार यांच्या न समजणाऱ्या स्वभावामुळे असावं .कारण पवार कधी कोठे कसा कोणाचा गेम करतील ते सांगणे कठीण आहे .एकीकडे भाजप च्या विरोधात दंड थोपटणारे पवार बारामती मध्ये नरेंद्र मोदींना पायघड्या घालताना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ,अनेकांनी तेव्हा पवार यांचा आता थेट राष्ट्रपती पदावर डोळा असल्याचं म्हटलं होत . पवार सत्तेत असोत कि नसोत त्यांचा शब्द अंतिम असतो हे अनेकांनी अनुभवले आहे .मात्र हेच पवार फार काळ सत्तेबाहेर राहू शकत नाहीत असा देखील अनेकांचा अनुभव आहे .
शरद पवार हे अजातशत्रू नेतृत्व आहेत हे त्यांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे,राज्याच्या बाहेर हि त्यांनी देवेगौडा असोत कि ममता अथवा लालू प्रसाद यादव किंवा नितीशकुमार यांच्याशी कायम सख्य ठेवले आहे त्यामुळेच केंद्राच्या राजकारणात त्यांचा कायम दबदबा राहिलेला आहे,पवार यांनी राज्यात देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मैत्रीचे बंध कायम जपले आहेत हे सर्वश्रुत आहे .एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी स्नेह जपणारे पवार हे त्याचं वेळी नागपुरात जाऊन नितीन गडकरी यांच्याशी देखील मैत्री जपताना महाराष्ट्राने पाहिले आहे .त्यामुळे पवार कोणाशी कधी कसे वागतील आणि कोणाशी त्यांची मैत्री जमेल याबाबत सांगणे कठीण आहे . " एक बार उपर वाले के दिल में क्या है यह बताया जा सकता है किंतु पवार साहब के दिल में क्या है यह बताना मुश्किल है " असं जाणकार म्हणतात .ते अगदी खरं आहे .
गेल्या दोन वर्षात राज्यातील देवेंद्र सरकार चा कारभार पाहता काय करावे हा यक्ष प्रश्न पडलेले पवार मध्येच पेशवे आणि छत्रपती यांच्याबाबत बोलून राजकारणात काही घडते का याचा अंदाज घेताना दिसतात तर मध्येच राज्यभर निघणारे मराठा मोर्चे हे सरकार विरोधातील असंतोष असल्याचे सांगून सरकार ला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात .
पाऊणशे वयोमान पार केलेल्या पवारांना हे बोलण्याची किंवा राज्यात पुन्हा लक्ष घालण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना पडू शकतो मात्र उत्तर एकच आहे की " पवार पावर कर बिना नही रह सकते ".ऍट्रॉसिटी रद्द करा म्हणून बोलणारे पवार दुसऱ्याच दिवशी त्यात सुधारणा करण्याचा यू टर्न घेताना दलित समाज आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेताना दिसतात . पूर्वी छत्रपती पेशव्यांना जहागिऱ्या वाटायचे आज उलटे होत आहे हे त्यांचे भाष्य असो की भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे हे वक्तव्य यातून पवारांना राज्यातील सत्तेवरून देवेंद्र फडणवीस यांना हटवायचे आहे हेच दिसून येते.
कोपर्डी च्या घटनेच्या पार्षवभूमीवर निघणाऱ्या मराठा मोर्चाचे पवारांनी समर्थन करताना सरकार अडचणीत कसे सापडेल याची पुरेपूर काळजी घेतली मात्र त्याच वेळी दलित आणि ओबीसी समाजाने देखील आपल्या अस्तित्वासाठी मोर्चे काढल्याने पवारांचा प्लॅन (राजकीय लाभ घेण्याचा ) फसल्याचे चित्र आहे .
राज्यात पूर्वीपासून मराठा समाजाचे स्व शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक मराठा नेते झाले ,आहेत मात्र महाराष्ट्र आणि मराठा समाज म्हटलं की शरद पवार यांचेच नाव समोर येते .त्याच शरद पवार यांनी यावेळी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे,सारीपाटाचा डाव टाकला आहे आता त्यात ते कोणत्या प्याद्याचा वापर करून कोणत्या नेत्याला अडचणीत आणतात कि पुन्हा एकदा नवा डाव मांडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
एकवेळ सागराचा तळ समजू शकतो किंवा आभाळाची उंची मोजता येईल मात्र शरद पवार यांच्या मनाचा थांग पत्ता लागणे कठीण आहे अशा या महान व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया रिपोर्टर ,बीड
9422744404