शुक्रवार, २८ जुलै, २०१७

राजकारणातील धगधगती मशाल

राजकारणातील धगधगती मशाल -

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या काळात जी काही नावं प्रकर्षाने चर्चिली जातात किंवा प्रकाश झोतात आहेत त्यामध्ये आघाडीवर असणार नाव म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे होय,देशाच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी पंकजा यांच्यावर नियतीने अचानक टाकली नव्हे लादली,मनिध्यानी नसताना मुंडेंचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि त्यानंतर पंकजा यांच्यामध्ये साहेबांना पाहण्याचा जनतेचा कौल,आशा परिस्थितीत पंकजा यांनी  जो आपला वेगळा ठसा उमटवला आहे त्याला तोड नाही.

विदेशात शिक्षण घेतलेल्या पंकजा यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांना परत आपल्या भागात यावं लागेल,एवढ्या मोठ्या घरची लेक,लग्न ,संसार यात रममाण झालेली असताना आठ वर्षांपूर्वी अचानक त्यांच्यावर पक्षाने विधान सभेची जबाबदारी टाकली अन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला,त्या अगोदर काही वर्षे त्यांनी आपल्या बाबांसाठी या भागात प्रचाराच्या माध्यमातून राजकारण प्रवेश केला होता मात्र त्यावेळी त्यांनाही याची कल्पना नसावी की भविष्यात त्यांच्यावरच एवढी मोठी जिमेदारी येईल म्हणून.

एकीकडे धनंजय मुंडे यांच्यासारख्या सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या भावाने साथ सोडलेली असताना आणि वडिलांचे छञ हरपले असताना पंकजा यांनी लोकमताच्या आशीर्वादावर राजकारणाच्या आखाड्यात आपले पाय घट्ट रोवायला सुरवात केली होती.नशिबानेच जर ही जबाबदारी दिली असेल तर आलेल्या परिस्थितीला तोंड देत संघर्ष करायचा हे बाळकडू वडिलांकडून मिळाल्याने पंकजा यांनी न डगमगता हे शिवधनुष्य पेलले.वडीलांपासून मिळालेला संघर्षाचा वारसा त्यांनी पुढेही यशस्वी पणे पेलला.महाराष्ट्रात संघर्ष यात्रेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचाच उल्लेख असेल हे कोणीही नाकारू शकणार नाही.

ऊबड़ खाबड़ रस्ते भी, समतल हो सकते हैं,
कोशिश की जाए तो मुद्दे हल हो सकते हैं.

शर्त यही है कोई प्यासा हार न माने तो,
हर प्यासे की मुट्ठी मेँ बादल हो सकते है.
 अस काहीसं पंकजा यांच्याबाबतीत म्हटल्यास ते वावग ठरणार नाही.

पंकजा मुंडे यांना जे लोक जवळून ओळखतात ते दुसरे साहेब म्हणूनच सांगतात,वागण्या,बोलण्याची तीच पद्धत,भाषणातील चढ उतार सारखेच,डोळे बंद करून जर कोणी पंकजा यांचे भाषण ऐकले तर त्याला मुंडे साहेबांची आठवण येणार हे नक्की.त्यांनी मुंडे साहेबांचा फक्त एकच गुण घेतला नाही तो म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यालादेखील एंटरटेन करण्याचा.एवढ्या बाबतीत त्या थोड्या वेगळ्या वाटतात,नव्हे आहेतच.विनाकारण नको ती काम आणत जाऊ नका,बदल्या,नोकऱ्या,गुत्तेदारी ही माझी काम नाहीत,गावाचा विकास,गावचे प्रश्न,समस्या याबाबत माझ्याकडे या एवढं थेटपणे बोलणारा राजकारणी आजकाल पहावयास मिळत नाही.कदाचित अनेकांना त्यांचा हा स्वभाव खटकतो मात्र त्याला इलाज नाही.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामुळे ग्रामविकास सारख्या खात्याला देखील नवे आयाम मिळाले. बीड जिल्ह्यात तर त्यांनी रस्ते,आरोग्य, वीज यासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला.राजकारण हे निवडणुकीपूरत करायचं नंतर विकास हे एकच लक्ष डोक्यात ठेवायचे हा मंत्र त्यांनी जपला आहे.

बिनधास्त,बेधडक,जे आहे ते तोंडावर,पुढे एक मागे एक,असा पंकजा यांचा स्वभाव दिसत नाही.त्यांच्या थेट बोलण्यामुळे अनेकवेळा जवळचे लोक देखील दुखावतात मात्र त्यांना स्वभाव माहीत असल्याने ते समजून घेतात.ग्रामविकास बरोबरच त्यांनी जलयुक्त शिवरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शिवारात जे हिरवं सपान फुलवण्याचा प्रयत्न केला तो विशेष म्हणावा लागेल,सरकारी योजना लालफितीत अडकतात हा आजवरचा अनुभव मात्र पंकजा मुंडे यांनी जलयुक्त सारखी योजना थेट बांधावर जाऊन राबवण्यास लावली.बिडकरांच्या जिव्हाळ्याच्या नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न त्यांनी दोन वर्षात मार्गी लावला.

फडणवीस सरकारमधील जे काही चार दोन चेहरे चर्चेत असतात त्यातील एक म्हणजे पंकजा मुंडे होय.तथाकथित चिक्की घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता मात्र त्यांनी त्यावर मात केली, मंत्री पदावर असतानाही कुटुंबाला वेळ देण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असतो . राज्यात त्या कोठेही असल्या तरी मतदार संघावर नेहमी लक्ष असतं हे ही तेवढंच खरं, अर्थात राजकारणाच्या आणि विशेष म्हणजे निवडणुकीच्या बदलत्या तंत्राबाबत त्या तितक्याश्या माहीर नाहीत हे देखील वेळोवेळी जाणवतं, मुंडे साहेब ज्या पद्धतीने जुगाड करून विजय मिळवायचे ती पद्धत कदाचित अद्याप पंकजा यांच्या अंगी यायला वेळ लागेल,मात्र त्याची चुणूक त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवून दिली.

पंकजा मुंडे या जर राजकारणा ऐवजी एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या मालक असत्या तर ती कंपनी त्यांनी सर्वोच्च शिखरावर नेली असती हे नक्की,अर्थात त्या आज ज्या क्षेत्रात आहेत तेथेही त्यांचे काम आभाळाएव्हढे मोठे आहे यात शंका नाही.राजकारणी माणसं नेहमी खोटं बोलतात,वेळकाढू पणा करतात,तोंडपूरत बोलतात असा अनेकांचा अनुभव आहे मात्र पंकजा मुंडे याला अपवाद आहेत.काम होत असेल तर हो म्हणणार नाहीतर नाही म्हणून तोंडावर सांगायला सुद्धा धमक लागते ती पंकजा यांच्यामध्ये दिसते. अलीकडच्या काळात त्या बऱ्याच वेळा कठोर शब्दात बोलायचे टाळू लागल्याचं दिसतं, कदाचित राजकारणातील अनुभवाचा तो भाग असावा,मात्र हा बदल अनेकांना सुखावणारा आहे. रात्री अपरात्री आपले फोन घेतले जावेत,आपली अडचण ऐकून घेतली जावी ही कार्यकर्त्यांची ईच्छा असते मात्र एक महिला म्हणून त्यांनाही काही बंधन आहे याचा विचार करायला हवा.

गोपीनाथ मुंडे यांनी जनकल्याणाचा जो वसा त्यांना सुपूर्द केला आहे तो त्या पूर्ण करतील यात काही शंका नाही.त्यांच्या हातून जनसेवेच हे यज्ञकुंड अखंड धगधगत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,पंकजा ताई आपणाला दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

सवत रंडकी झाली .....!

सवत रंडकी झाली .......!

एखादा माणूस जर ऐकत नसेल तर त्याचा नाद सोडून आपली वाटचाल करावी हा साधा संकेत आहे,बिहार मध्येही काहीसे असेच घडले,भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लालूपुत्र तेजस्वी यादव हे स्वतःहून राजीनामा देतील अशी नितेश कुमार यांची अटकल होती मात्र तेजस्वी काही मागे हटत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर नितीश यांनीच पुढाकार घेतला अन तेजस्वी यांना मंत्रिमंडळातून काढण्याची रिस्क घेण्याऐवजी त्यांनी स्वतःहून राजीनामा देणे पसंत केले.या माध्यमातून त्यांनी एका फटक्यात सगळं चित्रच पालटून टाकलं.आपलं ऐकलं जात नाही म्हटल्यावर त्यांनी राजीनामा देऊन " हम तो डुबेंगे सनम पर तुमको भी लेके " असा कारभार करत नवरा मेल्याच दुःख न करता सवत रंडकी करून मोकळे झाले.

2014 मध्ये गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झाला अन नितीश यांच्यासारखे अनेक काजवे अचानक लुप्त झाले,मोदी यांच्या सुनामी मध्ये 70 वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ची पाळंमुळं हलली नव्हे मुळापासून उपटली गेली,लालू,ममता,पवार यांच्यासारखे दिगग्ज भुईसपाट झाले.मोदी सुनामी एवढी मोठी होती की तीन वर्षानंतर ही आज देखील विरोधी पक्ष सुन्न आहे.

मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने तीन वर्षात तब्बल अठरा राज्यात आपली घोडदौड कायम ठेवली.जिथे स्वबळावर शक्य आहे तिथे स्वबळावर नाहीतर मित्रपक्षांना सोबत घेत भाजप ने म्हणजेच मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने देश पादाक्रांत करण्याचा विडा यशस्वी करून दाखवला.मोदी यांना टक्कर देऊ शकेल असा नेता विरोधकांकडे नसताना सगळेच नितीश कुमार यांच्याकडे कडवे मोदी विरोधक म्हणून पाहत होते.
बिहार मध्ये झालेल्या निवडणुकीत नितीश यांनी मोदींचा चौखूर उधळलेल्या वारू रोखला आणि विरोधकांच्या स्वप्नांना बळ मिळाले.नितीश हे देशाच्या राजकीय पटलावर मोदींना विरोध करू शकतात अशी आशा निर्माण झाली.नितीश यांच्या डीएनए मध्ये काहीतरी वेगळं आहे याचा साक्षात्कार विरोधकांना झाला,मात्र वर्षभरापूर्वी विरोधकांच्या फुग्यातील हवा नितीश यांनी नोटबंदी,सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्यावर मोदींना साथ देत काढून घेतली,तेव्हापासून च नितीश हे मोदी यांच्या जवळ जात असल्याचे दिसत होते मात्र मरता क्या न करता या पद्धतीने विरोधकांना अजूनही नितीश यांच्याकडून आशा होती.

दरम्यान लालुचे दिवटे चिरंजीव तेजस्वी यांचा असा काही प्रकाश भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पडला की समाजवादी विचारधारा असणारे नितीश कुमार अस्वस्थ झाले.लालू पुत्र स्वतःहून राजीनामा देतील अशी भाबडी आशा नितीश यांना होती मात्र संधीच एऑन सोनं करतील तर लालू कसले त्यांनी नितीश यांच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.तेजस्वी यांच्यावरील आरोप खोटे असून ते राजीनामा देणार नाहीत नितीश यांनीच काय तो निर्णय घ्यावा अशी भूमिका लालू यांनी घेतली.त्यानंतर मात्र नितीश यांनी  डाव टाकला,तेजस्वी हर राजीनामा देत नाहीत त्यांना काढले तर सरकार अल्पमतात जाऊ शकते या सर्व शक्यता पडताळून पहात त्यांनी स्वतःहून राजीनामा देत सगळ्यांनाच धक्का दिला.या राजकीय भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की त्यात लालू राज तर उध्वस्त झालेच पण काँग्रेस अजूनही कोमातून बाहेर येऊ शकलेली नाही.

नितीश असा काही निर्णय घेतली अशी कोणालाच अपेक्षा नव्हती मात्र या सगळ्या खेळीचे जे जनक होते ते मोदी शहा मात्र पडद्याआडून सगळं शांत पणे पहात होते,गेल्या वीस महिन्यापासून जो डाव मोदी शहा जोडीने टाकला होता त्यात त्यांना यश आले.शिकारी खुद् यांहा शिकार बन गया अशी काहीशी अवस्था नितीश यांची झाली.

वर्षभरापासून मोदी यांच्याशी नितीश यांची वाढलेली जवळीक अखेर फळाला आली,एका रात्रीत राजीनामा आणि पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ हे फक्त बिहार मध्येच होऊ शकते,राजीनामा देताना किंवा भाजपशी हातमिळवणी करताना नितीश कुमार यांनी स्वपक्षीय लोकांना देखील विश्वासात घेतले नाही.अवघ्या पंधरा तासात नितीश यांनी हिट विकेट होत लालूपुत्र तेजस्वी यांची विकेट घेतली,तसेच काँग्रेस ला मैदानाबाहेर फेकले आणि वीस महिन्यापासून बौन्ड्रीवर असणाऱ्या भाजपला टीम मध्ये घेत सगळी गणित बिघडवून टाकली.

नितीश यांनी बिहार मध्ये जो भूकंप घडविला त्याचे धक्के महाराष्ट्रात देखील बसल्याचे चित्र आहे,नितीश यांच्या धक्क्या अगोदर दोन दिवस देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खुर्चीला अदृश्य हात मदत करतील असे सांगितले होते यावरूनच सगळे लक्षात येते.मोदी शहा यांची जोडगोळी किती चाणाक्ष आहे याचा नमुना बिहारमुळे सगळ्यांनाच लक्षात आला असेल त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची भाषा करणारे आणि राजीनामे खिशात घेऊन फिरणारे काही दिवस तरी शांत होतील हे नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...