गरजने वाले बरसते भी है
जो गरजते है वो कभी बरस ते नही असं म्हटलं जातं मात्र काल भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिले ते पाहता जो गरजते है वो बरस ते भी है हेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.मोदी यांनी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला तो ओसामा बिन लादेन याला कंठस्नान घालताना अमेरिकेने जी युद्धनीती अवलंबिली तीच पद्धत फॉलो केल्याचे दिसून येते.देशहितार्थ एखादा निर्णय हा चॅनेल च्या वोर रूममध्ये बसून होत नसतो तर त्यासाठी ठराविक स्टॅटिजी असते हेच मोदी यांनी दाखवून दिलं आहे.मोदी यांच्या डिनर डिप्लोमसी बद्दल जेवढी चर्चा झाली तेवढीच नव्हे त्यापेक्षा जास्त चर्चा आता मोदी यांच्या या गनिमी काव्याची होईल यात शंका नाही.
उरी येथे पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी हल्ला करीत 18 भारतीय जवानांना मारले,त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेबद्दल अनेक बोरू बहाद्दर आणि पॅनल पंडितांनी आठ दहा दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालवले,थेट हल्ला करून जशास तसे उत्तर द्या,आता युद्धच करा,पाकला धडा शिकवा अशा एक ना अनेक सूचना केल्या जात होत्या.कोणी सांगितलं की पाकिस्तान सोबत असलेला सिंधू करार मोडून टाका तर कोणी म्हटलं पाकिस्तान सोबतचे संबंध तोडून टाका मात्र मोदी शांत होते,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले तरी देखील अनेकांनी भारताच्या भूमिकेवर शंका घेतली,मोदी शांत आहेत याचा अर्थ त्यांनी माघार घेतली आहे असा काहींनी अर्थ काढला मात्र "शेर जब दो कदम पिछे जाता है तो वो हार नाही मानता बल कि एक कदम आगे बढकर हमले कि तैयारी करता है"असच काहीसं मोदी यांनी केलं.
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय लष्कराने पाकड्यांची जी शस्त्रक्रिया केली ती बिनतोड होती यात शंका नाही,साधारण पणे अडीच वर्षांपूर्वी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तान मध्ये घबराट निर्माण झाली होती,जणू काही मोदी आता जगाच्या नकाशावरून पाकचे नामोनिशाण मिटवून टाकणार असे वातावरण भारत आणि पाक या दोन्ही देशात निर्माण करण्यात आले होते,मात्र शपथविधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मोदी यांनी आपली जागतिक इमेज मोठी केली,त्यांनतर शरीफ यांना शाल भेट दिली तर त्यांच्या वाढदिवसाला अचानक भेट देवून सगळ्यांनाच धक्का दिला.
मोदी यांनी हे सगळं करताना नेपाळ,अफगाणिस्थान,अमेरिका,या सारख्या देशांचे दौरे करीत भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,मोदी हे जेवढ्या काळ बाहेर देशाच्या दौऱ्यावर राहिले तेवढे काळ भारतात देखील राहिले नाही म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली,मात्र या दौऱ्यांमधून त्यांनी पाकिस्तान ची अतिरेक्यांना पोसणार राष्ट्र म्हणून इमेज अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला,त्यात त्यांना यशही मिळालं,
आज अमेरिका असो की इतर देश यांना पाकिस्तान ने पोसलेल्या दहशतवादाचा फटका बसला आहे,त्यामुळे उरी हल्ल्यानंतर पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे ही मागणी खुद्द अमेरिकेच्या संसदेत त्यांच्याच खासदारांनी केली,पाकचे पंतप्रधान मियाँ शरीफ हे कितीही शरीफ पणाचा बुरखा पांघरत असले तरी उरी हल्ल्यानंतर त्यांचा हा बुरखा टराटरा फाटला,
जखमी शेर बहोत खतरनाक होता है याचा प्रत्यय मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक मधून दाखवून दिल आहे,अगोदर भारताने सार्क संमेलनावर बहिष्कार टाकून पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली तर दुसरीकडे सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची चर्चा सुरु करून पाकला गाफील ठेवले,अवघ्या चार तासात लाईन ऑफ कंट्रोल पार करून घरात घुसून त्यांना त्यांची औकात दाखवून दिली.
नरेंद्र मोदी हे गुळमुळीत पंतप्रधान आहेत ते केवळ बोलघेवडे आहेत,चाय पे चर्चा करणाऱ्या माणसाने काहीच केले नाही पाकच्या कुरापती चालूच आहेत अशा चर्चा देशात सुरु होत्या मात्र मौका सभी को मिलता है या डायलॉगची आठवण मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक च्या माध्यमातून जगाला दाखवून दिले आहे ,ज्या अमेरिकेने मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना व्हिसा नाकारला होता मात्र आज तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे,हा काळाचा महिमा आहे,अवघ्या चार तासात मोदी यांनी जे केलं ते या अगोदर मागील वर्षी म्यानमार मध्ये करून पाकला एक सूचक इशारा दिला होता मात्र पाकने सुधारण्याचा प्रयत्न केलाच नाही,घरात एखादं कारट व्रात्य असेल तर त्याला दोन चार दा समजून सांगावे लागते नंतर मात्र त्याला त्याची शिक्षा करावीच लागते हाच प्रकार शेजारी देशाबाबत म्हणता येईल,"हम खामोश है इसका मतलब हम डरते है "असा समज पाकने भारताबाबत करून घेतला होता,पण मोदी यांनी आज जे केलं त्यानं पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे निश्चित.
लक्ष्मीकांत रुईकर,9422744404.
जो गरजते है वो कभी बरस ते नही असं म्हटलं जातं मात्र काल भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिले ते पाहता जो गरजते है वो बरस ते भी है हेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.मोदी यांनी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला तो ओसामा बिन लादेन याला कंठस्नान घालताना अमेरिकेने जी युद्धनीती अवलंबिली तीच पद्धत फॉलो केल्याचे दिसून येते.देशहितार्थ एखादा निर्णय हा चॅनेल च्या वोर रूममध्ये बसून होत नसतो तर त्यासाठी ठराविक स्टॅटिजी असते हेच मोदी यांनी दाखवून दिलं आहे.मोदी यांच्या डिनर डिप्लोमसी बद्दल जेवढी चर्चा झाली तेवढीच नव्हे त्यापेक्षा जास्त चर्चा आता मोदी यांच्या या गनिमी काव्याची होईल यात शंका नाही.
उरी येथे पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी हल्ला करीत 18 भारतीय जवानांना मारले,त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेबद्दल अनेक बोरू बहाद्दर आणि पॅनल पंडितांनी आठ दहा दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालवले,थेट हल्ला करून जशास तसे उत्तर द्या,आता युद्धच करा,पाकला धडा शिकवा अशा एक ना अनेक सूचना केल्या जात होत्या.कोणी सांगितलं की पाकिस्तान सोबत असलेला सिंधू करार मोडून टाका तर कोणी म्हटलं पाकिस्तान सोबतचे संबंध तोडून टाका मात्र मोदी शांत होते,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले तरी देखील अनेकांनी भारताच्या भूमिकेवर शंका घेतली,मोदी शांत आहेत याचा अर्थ त्यांनी माघार घेतली आहे असा काहींनी अर्थ काढला मात्र "शेर जब दो कदम पिछे जाता है तो वो हार नाही मानता बल कि एक कदम आगे बढकर हमले कि तैयारी करता है"असच काहीसं मोदी यांनी केलं.
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय लष्कराने पाकड्यांची जी शस्त्रक्रिया केली ती बिनतोड होती यात शंका नाही,साधारण पणे अडीच वर्षांपूर्वी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तान मध्ये घबराट निर्माण झाली होती,जणू काही मोदी आता जगाच्या नकाशावरून पाकचे नामोनिशाण मिटवून टाकणार असे वातावरण भारत आणि पाक या दोन्ही देशात निर्माण करण्यात आले होते,मात्र शपथविधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मोदी यांनी आपली जागतिक इमेज मोठी केली,त्यांनतर शरीफ यांना शाल भेट दिली तर त्यांच्या वाढदिवसाला अचानक भेट देवून सगळ्यांनाच धक्का दिला.
मोदी यांनी हे सगळं करताना नेपाळ,अफगाणिस्थान,अमेरिका,या सारख्या देशांचे दौरे करीत भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,मोदी हे जेवढ्या काळ बाहेर देशाच्या दौऱ्यावर राहिले तेवढे काळ भारतात देखील राहिले नाही म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली,मात्र या दौऱ्यांमधून त्यांनी पाकिस्तान ची अतिरेक्यांना पोसणार राष्ट्र म्हणून इमेज अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला,त्यात त्यांना यशही मिळालं,
आज अमेरिका असो की इतर देश यांना पाकिस्तान ने पोसलेल्या दहशतवादाचा फटका बसला आहे,त्यामुळे उरी हल्ल्यानंतर पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे ही मागणी खुद्द अमेरिकेच्या संसदेत त्यांच्याच खासदारांनी केली,पाकचे पंतप्रधान मियाँ शरीफ हे कितीही शरीफ पणाचा बुरखा पांघरत असले तरी उरी हल्ल्यानंतर त्यांचा हा बुरखा टराटरा फाटला,
जखमी शेर बहोत खतरनाक होता है याचा प्रत्यय मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक मधून दाखवून दिल आहे,अगोदर भारताने सार्क संमेलनावर बहिष्कार टाकून पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली तर दुसरीकडे सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची चर्चा सुरु करून पाकला गाफील ठेवले,अवघ्या चार तासात लाईन ऑफ कंट्रोल पार करून घरात घुसून त्यांना त्यांची औकात दाखवून दिली.
नरेंद्र मोदी हे गुळमुळीत पंतप्रधान आहेत ते केवळ बोलघेवडे आहेत,चाय पे चर्चा करणाऱ्या माणसाने काहीच केले नाही पाकच्या कुरापती चालूच आहेत अशा चर्चा देशात सुरु होत्या मात्र मौका सभी को मिलता है या डायलॉगची आठवण मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक च्या माध्यमातून जगाला दाखवून दिले आहे ,ज्या अमेरिकेने मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना व्हिसा नाकारला होता मात्र आज तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे,हा काळाचा महिमा आहे,अवघ्या चार तासात मोदी यांनी जे केलं ते या अगोदर मागील वर्षी म्यानमार मध्ये करून पाकला एक सूचक इशारा दिला होता मात्र पाकने सुधारण्याचा प्रयत्न केलाच नाही,घरात एखादं कारट व्रात्य असेल तर त्याला दोन चार दा समजून सांगावे लागते नंतर मात्र त्याला त्याची शिक्षा करावीच लागते हाच प्रकार शेजारी देशाबाबत म्हणता येईल,"हम खामोश है इसका मतलब हम डरते है "असा समज पाकने भारताबाबत करून घेतला होता,पण मोदी यांनी आज जे केलं त्यानं पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे निश्चित.
लक्ष्मीकांत रुईकर,9422744404.