गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

गरजने वाले बरस ते भी है

गरजने वाले बरसते भी है

जो गरजते है वो कभी बरस ते नही असं म्हटलं जातं मात्र काल भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर दिले ते पाहता जो गरजते है वो बरस ते भी है हेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.मोदी यांनी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला तो ओसामा बिन लादेन याला कंठस्नान घालताना अमेरिकेने जी युद्धनीती अवलंबिली तीच पद्धत फॉलो केल्याचे दिसून येते.देशहितार्थ एखादा निर्णय हा चॅनेल च्या वोर रूममध्ये बसून होत नसतो तर त्यासाठी ठराविक स्टॅटिजी असते हेच मोदी यांनी दाखवून दिलं आहे.मोदी यांच्या डिनर डिप्लोमसी बद्दल जेवढी चर्चा झाली तेवढीच नव्हे त्यापेक्षा जास्त चर्चा आता मोदी यांच्या या गनिमी काव्याची होईल यात शंका नाही.
उरी येथे पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी हल्ला करीत 18 भारतीय जवानांना मारले,त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेबद्दल अनेक बोरू बहाद्दर आणि पॅनल पंडितांनी आठ दहा दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालवले,थेट हल्ला करून जशास तसे उत्तर द्या,आता युद्धच करा,पाकला धडा शिकवा अशा एक ना अनेक सूचना केल्या जात होत्या.कोणी सांगितलं की पाकिस्तान सोबत असलेला सिंधू करार मोडून टाका तर कोणी म्हटलं पाकिस्तान सोबतचे संबंध तोडून टाका मात्र मोदी शांत होते,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले तरी देखील अनेकांनी भारताच्या भूमिकेवर शंका घेतली,मोदी शांत आहेत याचा अर्थ त्यांनी माघार घेतली आहे असा काहींनी अर्थ काढला मात्र "शेर जब दो कदम पिछे जाता है तो वो  हार नाही मानता बल कि एक कदम आगे बढकर हमले कि तैयारी करता है"असच काहीसं मोदी यांनी केलं.
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय लष्कराने पाकड्यांची जी शस्त्रक्रिया केली ती बिनतोड होती यात शंका नाही,साधारण पणे अडीच वर्षांपूर्वी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तान मध्ये घबराट निर्माण झाली होती,जणू काही मोदी आता जगाच्या नकाशावरून पाकचे नामोनिशाण मिटवून टाकणार असे वातावरण भारत आणि पाक या दोन्ही देशात निर्माण करण्यात आले होते,मात्र शपथविधीला पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून मोदी यांनी आपली जागतिक इमेज मोठी केली,त्यांनतर शरीफ यांना शाल भेट दिली तर त्यांच्या वाढदिवसाला अचानक भेट देवून सगळ्यांनाच धक्का दिला.
मोदी यांनी हे सगळं करताना नेपाळ,अफगाणिस्थान,अमेरिका,या सारख्या देशांचे दौरे करीत भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,मोदी हे जेवढ्या काळ बाहेर देशाच्या दौऱ्यावर राहिले तेवढे काळ भारतात देखील राहिले नाही म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली,मात्र या दौऱ्यांमधून त्यांनी पाकिस्तान ची अतिरेक्यांना पोसणार राष्ट्र म्हणून इमेज अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला,त्यात त्यांना यशही मिळालं,
आज अमेरिका असो की इतर देश यांना पाकिस्तान ने पोसलेल्या दहशतवादाचा फटका बसला आहे,त्यामुळे उरी हल्ल्यानंतर पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे ही मागणी खुद्द अमेरिकेच्या संसदेत त्यांच्याच खासदारांनी केली,पाकचे पंतप्रधान मियाँ शरीफ हे कितीही शरीफ पणाचा बुरखा पांघरत असले तरी उरी हल्ल्यानंतर त्यांचा हा बुरखा टराटरा फाटला,
जखमी शेर बहोत खतरनाक होता है याचा प्रत्यय मोदी यांनी सर्जिकल  स्ट्राईक मधून दाखवून दिल आहे,अगोदर भारताने सार्क संमेलनावर बहिष्कार टाकून पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली तर दुसरीकडे सिंधू कराराबाबत पुनर्विचार करण्याची चर्चा सुरु करून पाकला गाफील ठेवले,अवघ्या चार तासात लाईन ऑफ कंट्रोल पार करून घरात घुसून त्यांना त्यांची औकात दाखवून दिली.
नरेंद्र मोदी हे गुळमुळीत पंतप्रधान आहेत ते केवळ बोलघेवडे आहेत,चाय पे चर्चा करणाऱ्या माणसाने काहीच केले नाही पाकच्या कुरापती चालूच आहेत अशा चर्चा देशात सुरु होत्या मात्र मौका सभी को मिलता है या डायलॉगची आठवण मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक च्या माध्यमातून जगाला दाखवून दिले आहे ,ज्या अमेरिकेने मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना व्हिसा नाकारला होता मात्र आज तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे,हा काळाचा महिमा आहे,अवघ्या चार तासात मोदी यांनी जे केलं ते या अगोदर मागील वर्षी म्यानमार मध्ये करून पाकला एक सूचक इशारा दिला होता मात्र पाकने सुधारण्याचा प्रयत्न केलाच नाही,घरात एखादं कारट व्रात्य असेल तर त्याला दोन चार दा समजून सांगावे लागते नंतर मात्र त्याला त्याची शिक्षा करावीच लागते हाच प्रकार शेजारी देशाबाबत म्हणता येईल,"हम खामोश है इसका मतलब हम डरते है "असा समज पाकने भारताबाबत करून घेतला होता,पण मोदी यांनी आज जे केलं त्यानं पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे निश्चित.
लक्ष्मीकांत रुईकर,9422744404.

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

सलाम बळीराजा तुझ्या हिमतीला सलाम

सलाम बळीराजा तुला त्रिवार सलाम बीड जिल्हा तसा मागासलेला म्हणूनच राज्यात प्रसिद्ध आहे,या जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे सारखा लढवय्या लोकप्रतिनिधी दिला,तसेच मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे वीर योध्ये देखील दिले,याच बीड जिल्ह्याने मागील चार वर्षात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ अनुभवला,आज मात्र बीड जिल्ह्याचा हा कलंक पुसला गेला आहे,जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत.
मागच्या तीन चार वर्षात कधीही बातम्या करण्याची वेळ आली तर मनावर दगड ठेवून कराव्या लागायच्या,कारण केवळ भेगाळलेली जमीन,रापलेले चेहरे,भकास अन पांढरी फट पडलेली कपाळ, अनेक घरचे करते पुरुष फासावर गेलेलं या डोळ्यांनी पाहिलं आहे,अनेक शेतकऱ्यांच्या चिता जळत असताना त्याच्या घरात चाललेला आक्रोश पाहून मन हेलावून जात होतं.
वाटायचं काय एवढं पाप केलंय आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी कि हा दुष्काळाचा कलंक पुसतच नाहीए, जनावरांचे अनेक बाजार फिरलो,लाखाचे सर्जा राजा कवडीमोल भावाने विकताना पाहिल्यानंतर मन विषण व्हायचं,कधी फिटणार हे दिवस असं वाटायचं,दुष्काळाचा फटका केवळ शेतकार्यालाच बसला होता असे नाही तर संपूर्ण बाजारावर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता,बियाणे बाजार असो की किराणा अथवा कापड बाजार प्रत्येक ठिकाणी दुष्काळाचे दशावतार दिसत होते.अगदी रियल इस्टेट वर देखील याचा गंभीर परिणाम दिसत होता,प्रत्येक जण दुष्काळाने पिचलेला दिसत होता,या दुष्काळानं बीड जिल्ह्याला दहा वर्षे मागं ढकललं,
यंदा मात्र मिरगाचा पाऊस जोरदार बरसला,त्यामुळे पिचलेल्या बळीराजाने मोठ्या उमेदीने काळ्या आईची ओटी भरली,वरूनराजांना देखील कृपा केली शेतकऱ्याच्या पदरात यंदा चांगलं दान पडणार असं दिसतं होत,मात्र महिनाभर पावसानं ताण दिला आणि बळीराजाच्या चिंतेत भर पडली,मात्र पोळ्याच्या अमावस्येला पावसाचं पुनरागमन झालं आणि बळीराजाचा जीव भांड्यात पडला.मात्र गणपती विसर्जनापासून पावसानं मनावर घेतलं आणि मागील तीन चार दिवसात पावसानं अक्षरशः बीड जिल्ह्याला झोडपून काढलं.जिल्ह्यात मागील आठ दहा वर्षांपासून कोरडा पडलेला बिंदुसरा तलाव भरभरून वाहिला एवढंच नाही तर मृत साठ्यात असलेली माजलगाव आणि मांजरा सारखी मोठी धरणं देखील ओव्हरफ्लो झाली.
उपर वाला जब भी देता ,देता छप्पर फाडके असं म्हणतात ते बीड करांनी मागील दोन दिवसात अनुभवलं,48 तासात मागच्या चार वर्षाचा दुष्काळ फिटला, सगळीकडे पाणीच पाणी झालं,नद्या ,नाले ,ओढे ,खळखळून वाहू लागले,बिंदुसरा,मांजरा,माजलगाव सारखी कोरडी ठाक पडलेली धरण भरली,भूगर्भाची पाण्याची भूक भागली,पुढच्या चार पाच वर्षांची चिंता मिटली,पावसाने सगळ्यांचं कल्याण केलं,
बीड जिल्ह्यातील 144 छोटे आणि मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत,जलयुक्त शिवार च्या कामामुळे शिवारात पाणी खेळू लागलं आहे, जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळी देखील चांगलीच वाढली आहे,जिल्ह्यातील विहिरी ,आड आणि बोअर ला भरपूर पाणी आलं आहे, पावसानं समद रान आबादानी केलं आहे,काळ्या मातीत मातीत तिफन चालते,तिफन चालते,मैना राघूच्या जोडीला हिरवं सपान पाहते अशी परिस्थिती आज जिकडे तिकडे झाली आहे .
मात्र या पावसानं बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला,आज दिवसभर गुडघाभर चिखलात रानावनात हिंडलो,बातमी शोधताना शेतकऱ्यांच्या व्यथा काय आणि किती असू शकतात हे जाणवलं,पाऊस नाही पडला तर दुष्काळ,आणि जास्त झाला तर ओला दुष्काळ,जगायचं कास हाच खरा प्रश्न मात्र तरीही बळीराजा आपले पाय घट्ट मातीत रोवून उभा आहे,अनेक शेतात जमीन खरवडून गेली आहे,तर शेकडो हेक्टर क्षेत्रावरील मळणी साठी आलेली बाजरी आडवी झाली आहे,फुलं आणि बोन्ड लागलेला कापूस पार जमिनीवर झोपलाय,अनेक शेतात तर पाणीच बाहेर निघालेलं नाही,सोयाबीन पुरतं संपलंय,
चार दिवस झाले शेतात जायला रस्ता देखील ठेवला नाही या पावसानं,अक्षरश धूळधाण झाल्याचं चित्र दिसून आलं,आता काय करायचं हा प्रश्न बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मात्र सलाम त्याच्या जिद्दीला,अनेकांनी सांगितलं" साहेब यंदा बक्कळ पाऊस झाला,खरीप हातचं गेलं,मातर अवनदा जे गेलं ते म्होरल्या टायमाला जोमानं यील कि,असला पाऊस लई गरजेचा हुता,आता बघा म्होरला हंगाम रब्बी कशी येति ते,पुढच्या तीन चार वर्षाची ददाद  मिटविली बघा या पावसानं 'असं म्हणून त्यांनी पावसाचं स्वागत केलं,तेव्हा वाटलं खरच बारा महिने शेतीत राब राब राबणाऱ्या या माणसाला बळीराजा का म्हणतात ते कदाचित या मुळेच असावं,सलाम बळीराजा तुला आणि तुझ्या धैर्याला ,सलाम तुझ्या मोठ्या मनाला,सलाम तुझ्या मोडण्यातून हि उभं राहण्याच्या जिद्दीला,सलाम तुझ्या सकारात्मक दृष्टीला,तू असाच खंबीर रहा, मग बघ कोणी तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही.
लक्ष्मीकांत रुईकर
9422744404

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...