गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

मुंडे म्हणजे बातमी आणि बातमी म्हणजे मुंडे




गोपीनाथ मुंडे सिर्फ नाम हि काफी है ,अस म्हणायला हरकत नाही,पत्रकारिता करताना मागील दहा पंधरा वर्षात मुंडे साहेब आणि माझ्या अनेक वेळा भेटी गाठी झाल्या,चर्चा झाली,अनेक वेळा म्हणजे बहुतांश वेळा त्यांच्यात आणि माझ्यात खटके च जास्त उडायचे,कारण माझा स्वभाव हा थेट प्रश्न विचारायचा आणि मुंडे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायला आम्ही दोन चार जण असायचो फक्त बाकी सगळे असायचे मात्र ते त्यांच्या पद्धतीने विचारायचे आम्ही थेट मुद्यावर बोलायचो,त्यामुळे अनेक वेळा मुंडे नाराज व्हायचे मात्र त्यांनी ते कधी जाहीर सांगितले नाही किंवा मनात कधी अढी ठेवली नाही,माणूस मोठा होता,भला होता,ग्रेट होता,बिनधास्त होता,मात्र तब्येतीच्या बाबतीत तेवढाच बेफिकीर किंवा बिनधास्त होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गोपीनाथ मुंडे नावाच्या वादळाचा प्रवास हा आणीबाणीच्या काळापासून सुरु झालेला,परळी सारख्या ग्रामीण भागातून थेट दिल्ली पर्यंत धडक मारणारा हा माणूस वाघाच्या काळजाचा होता यात शंका नाही,1995 ते 1999 हा युती सरकार चा काळ दोन व्यक्तीमुळे कायम स्मरणात राहिला,एक बाळासाहेब ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आणि रिमोट कंट्रोल तर दुसरे गोपीनाथ मुंडे यांचे मेनगेट टू रामटेक हे वाक्य.त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर बीड च्या माणसाला हे वाक्य पाठच झाले होत,त्या काळात आणि पुढील पाच दहावर्ष पोलीस असो कि प्रशासन एम एच 23 नंबर ची गाडी पहिली किंवा जरा उगरट भाषा ऐकली कि विचारायचे मुंडे साहेबांच्या जिल्ह्यातले आहात का? हि ओळख मुंडे यांनी कष्टातून कमावली होती,प्रमोद महाजन यांच्यासारखा दिलदार मित्र सहकारी नेता सोबत आणि विलासराव देशमुख यांच्या सारखा सख्खा शेजारी ,त्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला चार चांद लागले,

मुंडे जेव्हा जेव्हा बीड ला यायचे तेव्हा तेव्हा वेगळी बातमी मिळणार हे नक्की असायचे,जस आज हि म्हटलं जात कि ठाकरे म्हणजे बातमी तसा माझा अनुभव होता ,मुंडे म्हटलं कि बातमी मिळणार हे ठरलेलं असायचं,त्यांनी कधीच कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला नाही,बर विषयाची मर्यादा नव्हती,कोणताही विषय असो गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत थेट बोलणारा माणूस म्हणून मुंडे मीडिया मध्ये लोकप्रिय होते,

मला आठवत सुरेश धस ,रमेश आडसकर,अशोक डक यांनी अचानक जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा डाव टाकला तेव्हा मुंडे साहेब कमालीचे अस्वस्थ होते,नितीन कोटेचा यांच्या घरी प्रेस होती,त्यांना मी थेट विचारलं,निवडणूक कोणतेही असो ग्रामपंचायत किंवा लोकसभा तुम्हाला बीड मध्ये आठ दिवस तळ का ठोकावा लागतो,त्यांनी उसळून माझ्या प्रश्नाला उत्तर दिले,त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत तुला काही अडचण आहे का असे विचारत एवढं थेट विचारत जाऊ नकोस असा सल्ला दिला,मात्र मनात काही नव्हते.

त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या प्रेस मध्ये मी ,महेश वाघमारे सर,खिस्ती सर,उदय जोशी,नरेंद्र कांकरिया काका यांनी साहेबाना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले मात्र त्याचा त्यांनी कधीच राग मनात ठेवला नाही,

धनंजय मुंडे आणि त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर मीडिया ने मुंडेंच्या घरातील महाभारत असे विषय रंगवले ,ते अनेक वेळा व्यथित झाले खाजगीत बोलताना हळहळले मात्र मीडियावर कधी खापर फोडले नाही,मी वैद्यनाथ कारखान्यावर धनंजय मुंडे यांनी काढलेला मोर्चा कव्हर केला तेव्हा ते प्रचंड नाराज झाले,मला अनेक दिवस ते बोलत नव्हते,जे एवढे महत्वाचे नव्हते ते तू मोठे करून दाखवले ,तू माझ्या विरोधकांच्या सांगण्यावरून बातम्या करतो असं ते बोलले मात्र त्याचा त्यांनी कधी अतिरेक केला नाही,विरोधात बातमी आली तरी सहज पणे हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती ती कोणत्याच नेत्याकडे नव्हती,

मध्यंतरी गडकरी आणि मुंडे वाद देशात गाजत असताना मी थेट या प्रश्नाला हात घातला तेव्हा त्यांनी उत्तर दिले मात्र नंतर मला त्यांची पक्षातील होणारी घुसमट सांगितली.एकूण थक्क झालो मी,मुंडे सारख्या मोठ्या माणसाला देखील या अडचणी येतात हे तेव्हा कळले,मुंडे काही वर्षांपूर्वी पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु होत्या तेव्हा त्यांनी थेट फोन करून अरे काय चालवत आहात तुम्ही सगळ्या मनाच्या बातम्या लावत जाऊ नका जरा बोलत जा असं बोलून दाखवलं होत.

लोकसभा निवडणूक सुरु असताना त्यांचा दिनक्रम तरुणालाही लाजवणाराअसा होता,पहाटे उठून सुरु झालेला त्यांचा प्रवास उत्तर रात्री संपायचा,जिल्ह्यात कोठेही असले तरी ते मुक्कामाला परळी येथेच असायचे,

कितीही उशीर झाला तरी शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते कधीच विश्रांती साठी गेल्याचे ऐकिवात नाही,वैद्यनाथ कारखाना असो अथवा यशश्री बंगला मुंडे मीडिया साठी नेहमी अव्हेलेबल असायचे ,

मागील निवडणुकीत जी आश्वासने दिली त्यातील काहीच पूर्ण झाले नाही असा प्रश्न वाघमारे सरांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी तुला नंतर त्याचा हिशोब देतो आपण बोलू असे म्हणून वेळ मारून नेली होती,अमोल गलधर सारखा कार्यकर्ता रेल्वे प्रश्नावर अटक झाल्यानंतर थेट मुंबई वरून बीड शहर पोलीस ठाण्यात येणार एकच नेता बघितला आणि तो म्हणजे गोपीनाथ मुंडे,केज विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी एक दिवस अगोदर आम्ही अन्विता होटेल मध्ये मुंडे साहेबाना भेटलो होतो त्यावेळी त्यांना खिस्ती सरानी आणि मी आपली पोझिशन अवघड आहे अस सांगितलं होत तेव्हा हसून ते म्हणले अरे उन्हात पांढरे नाही झाले माझे केस तुमचं जेव्हढ वय आहे तेव्हढा अनुभव माझा आहे बघा जादूची कांडी काय करते ते,मात्र निकाल लागल्यानंतर आवर्जून त्यांनी आम्हाला फोन करून आमचे अंदाज खरे निघाल्याबद्दल आणि त्यांना खर सांगितल्याबद्दल अभिनंदन केलं होत

या लोकसभेच्या वेळी पुन्हा त्यांचा आणि माझा वाद झाला होता निकाल लागल्यानंतर त्यांनी आणि पंकजा मुंडे यांनी पॉलिटेक्निक च्या आवारात मला बोलले होते मात्र त्यानंतर लोकप्रश्न मध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला,लोकप्रश्न मधील त्यांची भेटशेवटची ठरली,मी पॉलिटेक्निक मध्ये भेटल्यामुळे मी लोकप्रश्न मध्ये गर्दीत घुसलो नाही मात्र त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले होते,ते अभिनंदन आणि ती भेट आजही आठवली कि डोळ्यात पाणी येत,खूप स्वप्न घेऊन दिल्लीला गेलेला हा निधड्या छातीचा माणूस अचानक काळाने हिरावून नेला आणि  मनातून रडू आलं,एवढ्या अचानक त्यांची अशा पद्धतीने एक्झिट अपेक्षित नव्हती मात्र काळापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणतात तेच खरे .

मुंडे साहेब आपल्यातून जाऊन आज सहा
वर्ष होत आहे मात्र आज हि त्यांचं ते कार्यक्रमाला उशिरा येणं, आल्या नंतर सभा सुरु होण्यापूर्वी किंवा भाषणाला उभं राहण्यापूर्वी स्टाईल मध्ये भांग पाडणं, सगळं सगळं आठवतं, बाईट देताना जमला ना रे अस विचारणं किंवा एखादी सभा झाल्यानंतर  भेट झाल्यास कशी झाली सभा अस विचारणं,भेटत जा रे तुम्ही लोक ,फोन करीत जा,बातम्या व्यतिरिक्त बोलत जा कधी कधी अस  हक्कानं म्हणणं सगळं काही आठवत,

परळीतील सुदाम मुंडे यांचं प्रकरण सुरु असताना अजित पवार यांनी नेकनूर च्या सभेत मुंडे आणि डॉ मुंडे यांचे फोटो दाखवल्या नंतर अरे माझा माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीशी घरगुती संबध आहे याचा अर्थ त्याच्या प्रत्येक कामात मी दोषी कसा असू शकतो अस म्हंणत त्यांनी चांगलीच आगपाखड केली होती,अगदी माझी ऑफिस ला तक्रार केली होती मात्र नंतर पत्की सरांच्या घरी भेटल्यानंतर आणि त्या अगोदर मोमीनपुर्यातील मोर्चा दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी खाजगीत सांगितल्या होत्या,मात्र त्यांनी आज कालच्या उथळ पोस्टरबाज नेत्यांसारखं धमकावन किंवा डूख धरण्याचा उद्योग कधी केल्याचं माझ्या तरी आठवणीत नाही,

अनेक गोष्टी आज जशा च्या तशा आठवत आहेत सगळं लिहायला बसलं तर पानभरल तरी जागा पुरणार नाही,कदाचित हा माझा अनुभव वाचून अनेक जण म्हणतील हि बाळासाहेब हि मुंडे ची माहिती होती कि आत्मस्तुती मात्र जे आठवलं ते लिहिलं इतकंच ,धन्यवाद.
लक्ष्मीकांत रुईकर, बीड 9422744404

मुंडे म्हणजे बातमी अन बातमी म्हणजे मुंडे


गोपीनाथ मुंडे सिर्फ नाम हि काफी है ,अस म्हणायला हरकत नाही,पत्रकारिता करताना मागील दहा पंधरा वर्षात मुंडे साहेब आणि माझ्या अनेक वेळा भेटी गाठी झाल्या,चर्चा झाली,अनेक वेळा म्हणजे बहुतांश वेळा त्यांच्यात आणि माझ्यात खटके च जास्त उडायचे,कारण माझा स्वभाव हा थेट प्रश्न विचारायचा आणि मुंडे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायला आम्ही दोन चार जण असायचो फक्त बाकी सगळे असायचे मात्र ते त्यांच्या पद्धतीने विचारायचे आम्ही थेट मुद्यावर बोलायचो,त्यामुळे अनेक वेळा मुंडे नाराज व्हायचे मात्र त्यांनी ते कधी जाहीर सांगितले नाही किंवा मनात कधी अढी ठेवली नाही,माणूस मोठा होता,भला होता,ग्रेट होता,बिनधास्त होता,मात्र तब्येतीच्या बाबतीत तेवढाच बेफिकीर किंवा बिनधास्त होता म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गोपीनाथ मुंडे नावाच्या वादळाचा प्रवास हा आणीबाणीच्या काळापासून सुरु झालेला,परळी सारख्या ग्रामीण भागातून थेट दिल्ली पर्यंत धडक मारणारा हा माणूस वाघाच्या काळजाचा होता यात शंका नाही,1995 ते 1999 हा युती सरकार चा काळ दोन व्यक्तीमुळे कायम स्मरणात राहिला,एक बाळासाहेब ठाकरे यांचा रोखठोक स्वभाव आणि रिमोट कंट्रोल तर दुसरे गोपीनाथ मुंडे यांचे मेनगेट टू रामटेक हे वाक्य.त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर बीड च्या माणसाला हे वाक्य पाठच झाले होत,त्या काळात आणि पुढील पाच दहावर्ष पोलीस असो कि प्रशासन एम एच 23 नंबर ची गाडी पहिली किंवा जरा उगरट भाषा ऐकली कि विचारायचे मुंडे साहेबांच्या जिल्ह्यातले आहात का? हि ओळख मुंडे यांनी कष्टातून कमावली होती,प्रमोद महाजन यांच्यासारखा दिलदार मित्र सहकारी नेता सोबत आणि विलासराव देशमुख यांच्या सारखा सख्खा शेजारी ,त्यामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला चार चांद लागले,

मुंडे जेव्हा जेव्हा बीड ला यायचे तेव्हा तेव्हा वेगळी बातमी मिळणार हे नक्की असायचे,जस आज हि म्हटलं जात कि ठाकरे म्हणजे बातमी तसा माझा अनुभव होता ,मुंडे म्हटलं कि बातमी मिळणार हे ठरलेलं असायचं,त्यांनी कधीच कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला नाही,बर विषयाची मर्यादा नव्हती,कोणताही विषय असो गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत थेट बोलणारा माणूस म्हणून मुंडे मीडिया मध्ये लोकप्रिय होते,

मला आठवत सुरेश धस ,रमेश आडसकर,अशोक डक यांनी अचानक जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा डाव टाकला तेव्हा मुंडे साहेब कमालीचे अस्वस्थ होते,नितीन कोटेचा यांच्या घरी प्रेस होती,त्यांना मी थेट विचारलं,निवडणूक कोणतेही असो ग्रामपंचायत किंवा लोकसभा तुम्हाला बीड मध्ये आठ दिवस तळ का ठोकावा लागतो,त्यांनी उसळून माझ्या प्रश्नाला उत्तर दिले,त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत तुला काही अडचण आहे का असे विचारत एवढं थेट विचारत जाऊ नकोस असा सल्ला दिला,मात्र मनात काही नव्हते.

त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या प्रेस मध्ये मी ,महेश वाघमारे सर,खिस्ती सर,उदय जोशी,नरेंद्र कांकरिया काका यांनी साहेबाना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले मात्र त्याचा त्यांनी कधीच राग मनात ठेवला नाही,

धनंजय मुंडे आणि त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर मीडिया ने मुंडेंच्या घरातील महाभारत असे विषय रंगवले ,ते अनेक वेळा व्यथित झाले खाजगीत बोलताना हळहळले मात्र मीडियावर कधी खापर फोडले नाही,मी वैद्यनाथ कारखान्यावर धनंजय मुंडे यांनी काढलेला मोर्चा कव्हर केला तेव्हा ते प्रचंड नाराज झाले,मला अनेक दिवस ते बोलत नव्हते,जे एवढे महत्वाचे नव्हते ते तू मोठे करून दाखवले ,तू माझ्या विरोधकांच्या सांगण्यावरून बातम्या करतो असं ते बोलले मात्र त्याचा त्यांनी कधी अतिरेक केला नाही,विरोधात बातमी आली तरी सहज पणे हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती ती कोणत्याच नेत्याकडे नव्हती,

मध्यंतरी गडकरी आणि मुंडे वाद देशात गाजत असताना मी थेट या प्रश्नाला हात घातला तेव्हा त्यांनी उत्तर दिले मात्र नंतर मला त्यांची पक्षातील होणारी घुसमट सांगितली.एकूण थक्क झालो मी,मुंडे सारख्या मोठ्या माणसाला देखील या अडचणी येतात हे तेव्हा कळले,मुंडे काही वर्षांपूर्वी पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु होत्या तेव्हा त्यांनी थेट फोन करून अरे काय चालवत आहात तुम्ही सगळ्या मनाच्या बातम्या लावत जाऊ नका जरा बोलत जा असं बोलून दाखवलं होत.

लोकसभा निवडणूक सुरु असताना त्यांचा दिनक्रम तरुणालाही लाजवणाराअसा होता,पहाटे उठून सुरु झालेला त्यांचा प्रवास उत्तर रात्री संपायचा,जिल्ह्यात कोठेही असले तरी ते मुक्कामाला परळी येथेच असायचे,

कितीही उशीर झाला तरी शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते कधीच विश्रांती साठी गेल्याचे ऐकिवात नाही,वैद्यनाथ कारखाना असो अथवा यशश्री बंगला मुंडे मीडिया साठी नेहमी अव्हेलेबल असायचे ,

मागील निवडणुकीत जी आश्वासने दिली त्यातील काहीच पूर्ण झाले नाही असा प्रश्न वाघमारे सरांनी विचारल्यानंतर मुंडे यांनी तुला नंतर त्याचा हिशोब देतो आपण बोलू असे म्हणून वेळ मारून नेली होती,अमोल गलधर सारखा कार्यकर्ता रेल्वे प्रश्नावर अटक झाल्यानंतर थेट मुंबई वरून बीड शहर पोलीस ठाण्यात येणार एकच नेता बघितला आणि तो म्हणजे गोपीनाथ मुंडे,केज विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी एक दिवस अगोदर आम्ही अन्विता होटेल मध्ये मुंडे साहेबाना भेटलो होतो त्यावेळी त्यांना खिस्ती सरानी आणि मी आपली पोझिशन अवघड आहे अस सांगितलं होत तेव्हा हसून ते म्हणले अरे उन्हात पांढरे नाही झाले माझे केस तुमचं जेव्हढ वय आहे तेव्हढा अनुभव माझा आहे बघा जादूची कांडी काय करते ते,मात्र निकाल लागल्यानंतर आवर्जून त्यांनी आम्हाला फोन करून आमचे अंदाज खरे निघाल्याबद्दल आणि त्यांना खर सांगितल्याबद्दल अभिनंदन केलं होत

या लोकसभेच्या वेळी पुन्हा त्यांचा आणि माझा वाद झाला होता निकाल लागल्यानंतर त्यांनी आणि पंकजा मुंडे यांनी पॉलिटेक्निक च्या आवारात मला बोलले होते मात्र त्यानंतर लोकप्रश्न मध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी तो विषय सोडून दिला,लोकप्रश्न मधील त्यांची भेटशेवटची ठरली,मी पॉलिटेक्निक मध्ये भेटल्यामुळे मी लोकप्रश्न मध्ये गर्दीत घुसलो नाही मात्र त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले होते,ते अभिनंदन आणि ती भेट आजही आठवली कि डोळ्यात पाणी येत,खूप स्वप्न घेऊन दिल्लीला गेलेला हा निधड्या छातीचा माणूस अचानक काळाने हिरावून नेला आणि  मनातून रडू आलं,एवढ्या अचानक त्यांची अशा पद्धतीने एक्झिट अपेक्षित नव्हती मात्र काळापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणतात तेच खरे .

मुंडे साहेब आपल्यातून जाऊन आज दीड वर्ष होत आहे मात्र आज हि त्यांचं ते कार्यक्रमाला उशिरा येणं, आल्या नंतर सभा सुरु होण्यापूर्वी किंवा भाषणाला उभं राहण्यापूर्वी स्टाईल मध्ये भांग पाडणं, सगळं सगळं आठवतं, बाईट देताना जमला ना रे अस विचारणं किंवा एखादी सभा झाल्यानंतर  भेट झाल्यास कशी झाली सभा अस विचारणं,भेटत जा रे तुम्ही लोक ,फोन करीत जा,बातम्या व्यतिरिक्त बोलत जा कधी कधी अस  हक्कानं म्हणणं सगळं काही आठवत,

परळीतील सुदाम मुंडे यांचं प्रकरण सुरु असताना अजित पवार यांनी नेकनूर च्या सभेत मुंडे आणि डॉ मुंडे यांचे फोटो दाखवल्या नंतर अरे माझा माझ्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीशी घरगुती संबध आहे याचा अर्थ त्याच्या प्रत्येक कामात मी दोषी कसा असू शकतो अस म्हंणत त्यांनी चांगलीच आगपाखड केली होती,अगदी माझी ऑफिस ला तक्रार केली होती मात्र नंतर पत्की सरांच्या घरी भेटल्यानंतर आणि त्या अगोदर मोमीनपुर्यातील मोर्चा दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी खाजगीत सांगितल्या होत्या,मात्र त्यांनी आज कालच्या उथळ पोस्टरबाज नेत्यांसारखं धमकावन किंवा डूख धरण्याचा उद्योग कधी केल्याचं माझ्या तरी आठवणीत नाही,

अनेक गोष्टी आज जशा च्या तशा आठवत आहेत सगळं लिहायला बसलं तर पानभरल तरी जागा पुरणार नाही,कदाचित हा माझा अनुभव वाचून अनेक जण म्हणतील हि बाळासाहेब हि मुंडे ची माहिती होती कि आत्मस्तुती मात्र जे आठवलं ते लिहिलं इतकंच ,धन्यवाद.

रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

शनी शिंगणापूर येथे एका महिलेने शनीचे दर्शन घेतल्याने सर्वत्र गोंधळ सुरु आहे,अरे काय चालले आहे हे,महिला बहीण,आई ,बायको,मुलगी म्हणून चालते,मग तिने दर्शन घेतले तर बिघडले कुठे,

एक महिला जर या देशाची राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,सरपंच होऊ शकते तर तिने दर्शन घेतले तर आकाश कोसळले का?काही लोक अशी आवई उठवतात कि हिंदू धर्मात हे झाले कि सगळे लोक टीका करतात मुस्लिम धर्माबद्दल कोणी चकार शब्द बोलत नाही,कोणाबद्दल बोलावे हे कोणीच ठरवू शकत नाही ,मात्र धर्म हे सांगत नाही कि स्त्री पुरुष भेदभाव करा म्हणून,तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी आणि विशेषतः काही धर्माच्या ठेकेदारांनी हा भेदभाव निर्माण केला,

अगदी रामाच्या काळापासून अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून विचार केला तर स्त्री ला कधीच दुय्यम मानले गेले नाही किंवा दुय्यम माना असे संगीतले गेले नाही,उलट राम असो अथवा कृष्ण त्यांच्या सोबत राधा कृष्ण,राम सीता असा उल्लेख आढळतो,

कोणत्याही देवाने महिलांचा अपमान करा असा संदेश दिलेला नाही

मग हा प्रकार काय सुरु आहे ,जो तो ज्याला वाटेल तसा वागतो आहे,त्या महिलेने पूजा केली तर देव आणि ती बघून घेतील त्यात इतरांनी का लुडबुड करावी,हाजी अली येथे महिलांना प्रवेअह नाकारला जातो ,कारण काय कोणालाच माहित नाही,गेली महिला तेथे तर आकाश कोसळणार कि समुद्र खवळणार आहे,मात्र हे विषय जर चर्चिले गेले नाहीत तर तथाकथित धर्म मार्तंढांची दुकान कशी चालतील,

देवी असो कि देव तो एकच आहे ना,बर स्त्री आणि पुरुष असा भेद केला तरी विठलाला पूजनारा देवीच्या चरणावर माथा टेकवतोच ना,का म्हणतो मी पुरुष आहे मी फक्त देवालाच पूजनार,नाही ना मग देव फरक करीत नाही आपण का करायचा,आपण आपल्या घरात आई,बायको,मुलगी यांच्या शरीराचे नखही कोणी पाहू नये यासाठी प्रयत्न करतो मात्र रस्त्यावरून जाताना दुसऱ्या बाईकडे वळून वळून बघतो,आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट हि वृत्ती बरोबर नाही,मध्यन्तरी कोल्हापूरच्या महालक्ष्मी ची पूजा महिलांनी करायची नाही असा आदेश निघाला का तर म्हणे देवी अपवित्र होते,देवीला चालत नाही,हे ठरवणारे कोण पुरुषच ना,असे असेल तर मग त्यांनी तरी का पूजा करावी देवीची,आपल्या घरच्या महिलांनी उघड्यावर फिरणे,वस्त्र बदलणे मान्य नाही आणि देवी ला मात्र फक्त पुरुषांनीच पुजायचे हे का?देवी हि माता आहे तिच्यावर सर्वांचा सारखा अधिकार आहे,तिच्या जवळ भेदाभेद नाही मग आम्ही तो करणारे कोण?कोणी दिला पुरुषांना हा अधिकार,

भारतातील सर्वाधिक मंदिरांचा जीर्णोद्धार हा अहिल्या देवी होळकर यांनी केला त्या सुद्धा एक महिलाच होत्या ना,इंग्रजी फौजांशी झुंजणाऱ्या राणी लक्ष्मीबाई चा आदर्श आम्ही सांगतो त्या देखील महिलाच अनेक महिलांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हा इतिहास आपण विसरतो आहोत का?आज एकीकडे स्त्री पुरुष समानता म्हणून ढोल बदवायचे आणि दुसरीकडे महिलेने पूजा केली म्हणून गोंधळ घालायचा हे शोभणारे नाही,भारतासारख्या लोकशाही मानणाऱ्या देशात आणि महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात यावर एवढा गोधलं व्हावा या सारखे दुर्दैव दुसरे काही नाही,

अनेक रणरागिणी ना जन्म देणाऱ्या या महाराष्ट्रात हे घडावे म्हणजे काय म्हणावे,भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी बाई जोशी असोत अथवा महिलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत या महिलाच होत्या,ज्यांच्या मूळे या राज्यात क्रांती घडली,

आई ,पत्नी,मुलगी म्हणून स्त्री मान्य असेल तर तिचे हक्क ,अधिकार ,तत्व ,भावना का मान्य नाहीत हे कळतं नाही,उद्या कोणी म्हणेल तुम्ही मान्य करता का महिलांचे स्वातंत्र्य अधिकार प्रत्येक बाबतीत,यावर वादविवाद होतील ते व्हायला हरकत नाही मात्र त्यात निकोप पणा असावा बिभस्त पणा ,विनाकारण विरोध नसावा,मात्र पुरुषी मानसिकता असणाऱ्या या देशात 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना हा गोधळ व्हावा हि शोकांतिका म्हणावी लागेल,

एका महिलेने शनी देवाची पूजा केली तर तिला शिक्षा देव देईल ना तुम्ही आम्ही शिक्षा देणारे कोण?हा अधिकार आपल्याला कोणी दिला,विनाकारण देवाचा ठेका घ्यायचा ,नको त्या गोष्टी करायच्या आणि त्याला विरोध झाला कि बोंबा ठोकायच्या हे बरोबर नाही,धर्म मग तो कोणताही असो हिंदू असो अथवा मुस्लिम किंवा इतर धर्म कोणत्याही धर्मात महिलांना हीन लेखा असे सांगितले जात नाही मात्र काही लोक ठरवून हे करतात हे थांबले पाहिजे असे वाटते

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...