रविवार, १७ एप्रिल, २०१६

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय

सुपारी पत्रकारिता म्हणजे काय?
आज काल पत्रकारांना किंवा चॅनेल ला नाव ठेवणे,त्यांच्या नावाने बोंब मारणे हि एक फॅशन झाली आहे,वर्षातील 365 दिवसांपैकी 350 दिवस ज्या नेत्यांच्या बातम्या हि वर्तमानपत्र किंवा चॅनेल लोकांपर्यंत पोहचवतात त्या नेत्यांना एखादी दुसरी बातमी विरोधात आली कि त्यांचा तिळपापड होतो,मग त्यांचे कार्यकर्ते माध्यमांच्या नावाने बोटं मोडायला सुरवात करतात,वास्तविक पाहता माध्यमं हि लोकांमध्ये जागृती करण्याचं काम करतात पण ज्या लोकांच्या जीवावर आपलं राजकारण (दुकान)सुरु आहे त्या लोकांच्या समस्या मांडून त्याबद्दल नेत्यांना जाब विचारला तर या नेत्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते
काल परवा असाच प्रकार बीड मध्ये घडला,जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांची बीड ला खरीप आढावा बैठक होती,या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बियर च्या कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला,तसा हा प्रश्न काही वावगा नव्हता ,त्यांनी त्याचे उत्तर दिले,ज्यामध्ये त्यांनी कारखान्यांना लागणारे पाणी आरक्षित असते त्यामुळे ते पाणी बंद करणे योग्य होणार नाही कारण त्यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील असं मत मांडल, त्यांचं मत वाईट नव्हतं,मात्र एकीकडे मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असताना आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रेल्वेने पाणी आणावं लागत असताना कारखान्यांना जर कोट्यवधी लिटर पाणी दिले जात असेल तर त्याबाबतीत विचार केला जाऊ शकतो,मात्र मंत्री मुंडे यांनी वेगळी भूमिका मांडली, त्यांची भूमिका माध्यमांनी दाखवली आणि मुंडे यांचा संताप झाला
माझी बदनामी करण्याचा विडा उचलला आहे,सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात आहे,या पत्रकारांसमोर तुकडे फेकले कि हे शांत होतील अस आणि इतर बरच काही त्या बोलल्या,वास्तविक पाहता माध्यमांनी ज्या बातम्या दाखवल्या त्यात काय चूक होत हे त्या सांगू शकल्या नाहीत,जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा विषय असो कि शनी शिंगणापूर चा विषय असो मला विनाकारण बदनाम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात तथ्य काहीच नाही असं दिसत ,
पंकजा मुंडे या राज्यात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने असो कि जलयुक्त शिवार च्या माध्यमातून असो फिरल्या तेव्हा याच माध्यमांनी त्यांना मोठा स्पेस दिला,भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना संबोधलं,त्या गावागावात गेल्या तेव्हा त्याची बातमी कव्हर केली अस असताना कधीच पंकजा यांना मीडिया किंवा पत्रकार सुपारी घेऊन बातम्या करतात अस वाटलं नाही,बरं त्यांच्या विरोधात सुपारी देणार कोण आणि घेणार कोण कारण केवळ त्यांची बदनामी करायचा विषयच नाही मग त्यांनी हा आरोप कशाच्या आधारावर केला,असा अनुभव त्यांना कोणत्या जिल्ह्यात किंवा माध्यमाच्या बाबतीत आला असेल तर त्यांनी तस जाहीर सांगावं,राज्यात आज अनेक समस्या आहेत,पाण्याचं संकट भीषण आहे अशा वेळी सरकार वर टीका टिप्पणी होणारच,सरकार म्हणून घेणारे मंत्री ,अधिकारी याना प्रश्न विचारले जाणारच त्यात वावगं अस काय आहे,पाण्याची समस्या आ वासून उभी असताना खडसे सारख्या मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी हेलिकॉप्टर साठी हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असेल तर त्याची बातमी होणारच,मोबाईल च बिल भरायला शेतकऱ्याकडे पैसे आहेत अस वक्तव्य खडसेंनी केल्यानंतर त्याचा समाचार घेतला जाणारच मग त्यावरून माध्यम बेजबाबदार कशी ठरवायची,
राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी टोल मुक्ती असो कि कर्जमाफी च्या घोषणा करणाऱ्या सेना भाजप च्या पुढार्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडला असेल तर माध्यमांनी त्याची आठवण करून दिली तर माध्यम सुपारी घेऊन बातम्या करतात हे म्हणन कितपत योग्य आहे,माध्यमांनी केवळ सरकार,मंत्री ,अधिकारी यांचे गोडवे गावेत आणि मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करावे अस यांचं म्हणन असेल तर ते करण योग्य होणार नाही,माध्यम हि जागल्याची भूमिका करीत असतात,मग त्यात काही लोक अपवाद असू शकतात मात्र त्यामुळे सगळे एक जात चोर आहेत अस कस म्हणता येईल,पंकजा मुंडे यांच्या कामाचा झपाटा पाहिला तर थक्क व्हायला होत,त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले तेव्हा याच माध्यमांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे याचा त्यांना विसर पडला कि काय,99 चांगल्या बातम्या छापल्या नंतर कधीच त्याची दखल न घेणाऱ्या या नेत्यांना एक बातमी विरोधात आली कि जमत नाही अस का?
पंकजा मुंडे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी जे निर्णय घेतले,किंवा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याची दखल नेहमीच मीडिया ने घेतली आहे,बीड ला त्या जे बोलल्या तेच चॅनेल वरून दाखवलं गेलं,मात्र त्यांचं म्हणन तोडून मोडून ट्विस्ट करून दाखवल्याचा आरोप त्यांनी केला ज्यात काही तथ्य नाही,त्यांच्या विभागाने जे काम केलं,किंवा सरकार जे काम करत ते माध्यमांनी दाखवायचं नाही अस ठरवलं तर चाललं का?अस कोणी करणार नाही मात्र सुपारी घेऊन पत्रकारिता केली जात असल्याचा त्यांचा आरोप दुर्दैवी म्हणावा लागेल,बीड सारख्या जिल्ह्यात बहुतांश पत्रकार या वृत्तीचे नाहीत,बरं जे इ मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांना पंकजा मुंडे यांनी कितीवेळा त्यांच्या भाषेत तुकडे टाकले,कार्यक्रम कव्हर करणे ऑफिसला पाठवणे हे काम ते बिचारे करतात,मात्र आमच्या कार्यक्रमाला या किंवा कव्हर करा अस देखील खुद्द मंत्री महोदया किंवा त्यांच्या यंत्रणेकडून कधीच सांगितलं जात नाही,मंत्र्यांना नसेल वेळ मिळत पण खालची यंत्रणा तर हे काम करू शकते ना,मग ते देखील होत नाही,बरं निरोप आलाच तर त्यांच्या कडून कधी काही मिळण्याची अपेक्षा केली जात नाही,काही लोक असतीलही ज्यांना मंत्री आले कि दारात उभं राहायची सवय आहे,ते स्वतःच्या स्वार्थासाठी असले उद्योग करीत असतीलही म्हणून सगळेच तसे आहेत हे म्हणन योग्य नाही,पत्रकार परिषदेत यायचे मंत्री,पुढारी जे सांगतील ते ऐकायचे आणि नंतर त्यांच्या कानाला लागून त्यांना हव्या तश्या बातम्या करायच्या हा उद्योग काही लोक करीत असतील,मात्र बहुतांश पत्रकार वेगळी काही बातमी मिळते का यासाठी प्रयत्नशील असतात,अशावेळी प्रश्न,उपप्रश्न विचारले जातात,मात्र त्यामुळे त्या पत्रकारांचा संबधित नेत्यांबद्दल पर्सनल काही मतभेद आहे असं नसत,केवळ प्रसंगानुरुप ते प्रश्न विचारलेले असतात पण असे प्रश्न विनाकारण बदनाम करण्यासाठी विचारले जात असल्याचा या नेत्यांचा गैरसमज होतो किंबहुना करून दिला जातो,त्यामध्ये काही तोंडपूजे कार्यकर्ते तर असतातच मात्र काही पत्रकारही आघाडीवर असतात आशा वेळी खऱ्या पत्रकारांची अडचण होते.
मागील पंधरा सोळा वर्षाच्या पत्रकरितेमध्ये मला तरी अजून सुपारी पत्रकारिता कशी करायची असते हे समजलेले नाही,माझ्यासारखा माणूस तोंडावर प्रश्न विचारून मोकळा होतो अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला ते पटत नाही म्हणून मी प्रश्नच विचारायचे नाही हे कितपत योग्य आहे,प्रश्न विचारणं माझं काम आहे उत्तर द्यायचे कि नाही हे त्यांनी ठरवावं,बीड च्या पत्रकरितेमध्ये सगळेच धुतल्या तांडळासारखे आहेत असंही म्हणन नाही मात्र त्याच वेळी सगळेच चूक आहेत हे म्हणन देखील संयुक्तिक नाही अस मला वाटत,शेवटी काय हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा भाग आहे,पण मीडिया ने केलेली टीका हि एवढी पर्सनल घेत नसतात हे मात्र नक्की
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...