शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

डॉन......!डॉन......!!डॉन.........!!!

डॉन..........! डॉन........!!डॉन ......!!!

काही माणसांच्या नशिबात कायम सत्तेचा लाभ असतो किंवा त्यांना कायम जे मनात आणलं ते मिळतं, ते जिथं जातील तिथं आपली वेगळी छाप सोडतात,असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सुरेश धस होय .जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते तीन वेळा आष्टी पाटोद्याचे आमदार,महसूल राज्यमंत्री आणि पुन्हा विधानपरिषद आमदार,हा धस यांचा यशाचा आलेख चढताच आहे .गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने जी प उपाध्यक्ष झालेल्या धस यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही,त्यामुळेच सत्तेच्या सारीपाटावरील डॉन म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली
 आहे .

आष्टी तालुक्यातील जामगाव येथून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरवात करणारे सुरेश धस हे इंजिनियर आहेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाही,बीडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका सायकलवर बसून त्यांनी बजरंग सोनवणे, सतीश परभणीकर  (कुलकर्णी) सारख्या सवंगड्या सोबत शिक्षण पूर्ण केले,महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाची आवड असणारे धस जामगाव चे सरपंच झाले,त्यानंतर साहेबराव दरेकर यांच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला अन पुढे मुंबईसह राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले .
ज्या दरेकरांनी त्यांना राजकारणात स्थिर होण्यास मदत केली त्यांनाच या शिष्यांन 1999 साली मात देत आमदारकी मिळवली,सुरवातीला भाजपकडून आमदार झालेल्या धस यांनी सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी अजित पवार यांच्याशी सलगी केली अन गोपीनाथ मुंडे सारख्या दिग्गज राजकारण्यांच्या हातातून बीड जिल्हा परिषदेची सत्ता हिसकावून घेतली,धस यांनी एवढा मोठा धक्का दिल्यानंतरही त्यांच्यात अन मुंडे साहेबांमध्ये कधी मनभेद पहायला मिळाले नाहीत,धस यांच्या पुतनीच्या लग्नात स्वतः मुंडे यांनी हजेरी लावून सुरेश धस यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे हे जाहीरपणे सांगितले होते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या,
काळाच्या ओघात धस यांनी राष्ट्रवादीची कास धरत शेवटच्या काही काळासाठी का होईना मंत्रिपद पदरात पाडून घेतलं .महसूल मंत्रिपदाची त्यांची कारकीर्द असो की महानंद च्या चेअरमन पदाचा कालावधी ते आपल्या बेधडक निर्णयामुळे कायम चर्चेत राहिले .
आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला ताकद भेटली तरच तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो या हेतूने त्यांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले .भीषण दुष्काळाच्या काळात जनावरं जगली पाहिजेत म्हणून राज्यातील सर्वात मोठी 55 हजार जनावरांची छावणी उभारण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे .या छावणीतून त्यांच्या पदरात मात्र बदनामीच जास्त पडली .
जिल्हा परिषद पासून काम केल्यामुळे मुंबई असो की दिल्ली विकासकामे कशी करायची,त्यासाठी निधी कसा आणायचा,प्रस्ताव कसे तयार करायचे याचा त्यांच्याएव्हढा दांडगा अभ्यास दुसऱ्या कोणाचा नसेल .
आष्टी पाटोद्याचे आमदार असतानाही कायम जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम राहिला पाहिजे या हेतूने त्यांनी अनेकांना अंधारातून मदत अन उघडपणे विरोधही केला,त्यामुळे अनेक हितशत्रू देखील तयार झाले .मात्र या माणसाने त्यांची कधीच फिकीर केली नाही .
रात्री अपरात्री कधीही केव्हाही कोणाचाही फोन उचलून त्याच काम मार्गी लावण्याची त्यांची वेगळी हातोटी आहे .ज्या पक्षात असतील त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी कसे जुळवून घ्यायचे अन काम कशी करून घ्यायची हे खरेच धस यांच्याकडून शिकण्यासारखे आहे .
राजकारणात निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा लागतो,एक चुकीचा निर्णय राजकीय करियर उध्वस्त करणारा ठरू शकतो मात्र धस यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले तेव्हा तेव्हा परिणामाची तमा बाळगली नाही .त्यातूनच मुंडे यांच्या विरुद्धचे जिल्हा परिषद मधील बंड असो की नुकत्याच झालेल्या जी प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय असो,प्रत्येक वेळी त्यांनी बेधडक अन बिनधास्तपणे निर्णय घेतले अन ते नेहमीच त्यांच्या पथ्यावर पडले .
राजकारणात नेत्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता लागू न देण्याचा गुण असावा लागतो,धस यांच्याकडे अशा गुणांची खाण आहे .पोटातील पाणी हलू न देणारा राजकारणी,समोरच्याला गोड बोलून आपलं इप्सित
साध्य करणारा माणूस म्हणून धस यांचा उल्लेख करावा लागेल .
लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघात त्यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला तो चांगल्या चांगल्या राजकीय धुरंधर व्यक्तींना विचार करायला लावणारा आहे .राजकारण हे व्यावसायिक पद्धतीने कसे करायचे हे धस यांच्याकडून शिकले पाहिजे .प्रचंड लोकसंग्रह ,मास लीडर म्हणून त्यांनी आपले नाव कमावले आहे.भुईवर बसून कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा अन प्रसंगी कामासाठी समोरच्याच्या अंगावर जात दोन हात करणारा राजकारणी अशी त्यांची इमेज असल्यानेच त्यांना राजकारणातील डॉन म्हटलं जातं .त्यांच्या या बिनधास्त स्वभावामुळे प्रशासनातील अधिकारी देखील त्यांना टरकून राहतात,एखाद काम हाती घेतल की ते पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही हा त्यांचा मूळ स्वभाव ."हम हम है,बाकी सब पाणी कम है "अशा पद्धतीने ते आजपर्यंत वागत आले आहेत,कर्म कर फल की चिंता मत कर अस म्हटलं जातं मात्र धस यांच्या बाबतीत फल मिलणेवाला हो तो ही कर्म करणा चाहीये अस म्हणावं लागेल,कारण काम होणार असेल तरच हा माणूस त्यात हात घालतो नाहीतर दुसऱ्या राजकारण्यासारखं नुसतं नादी लावण्याचं काम यांना जमत नाही .
लोकसेवेचा वारसा अन वसा घेऊन बारा महिने अठरा काळ जनतेच्या कामासाठी तत्पर असणाऱ्या या सालगड्यास  मनःपूर्वक शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर, बीड

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...