शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

संदीप क्षीरसागर मऊ मेणाहून कठीण वज्राहून

संदीप बद्दल थोडंसं......
काही लोकांबद्दल काय लिहावं असा प्रश्न कधी कधी पडतो,कावळ्याला कधी गरुडाचे पंख लावताही येतील पण आकाशाला गवसणी घालण्याचं बळ  आणि जिद्द मनातच असावी लागते असं म्हटलं जातं,कारण कोणीही उठून आकाशाला गवसणी घालू शकत नाही मात्र आमचे मित्र तथा हजारो तरुणांचे हृदयस्थान असणारे संदीप क्षीरसागर यांच्यात मात्र नक्कीच आकाशाला गवसणी घालण्याची ताकद आहे हे नक्की.

संदीप चा आणि माझा प्रथम संबंध आला तो दहा वर्षांपूर्वी आम्ही दोघे काठोडा या गावी एका क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाला गेलो होतो तेव्हा,तेव्हा संदीप ला जास्त बोलता देखील येत नव्हतं,आज हे कोणाला खरंही वाटणार नाही,गेल्या दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, संदीप आज कमालीचा प्रगल्भ झालाय, काही जणांना असं वाटणार नाही परंतु ते त्यांचं मत असेल,माझ्या मते एक राजकारणी,समाजकारणी, मित्र,अनेकांचा युवा नेता म्हणून संदीप खरोखर प्रगल्भ झालाय यात शंका नाही,
क्षीरसागर घराण्यातील हा तरुण आज राजकारणाच्या पटलावरील अढळ स्थान निर्माण केलेला ध्रुव तारा झालाय हे नक्की,जिल्हा परिषद मध्ये येण्याअगोदर संदिप ने पाच वर्षे पंचायत समिती मध्ये काम केलं,एक पंचायत समिती म्हणजे पूर्ण मतदारसंघ,त्यामुळे त्याला लोकांचे स्वभाव कळले,त्यांची काम कळली,कसं वागायचं,कसं बोलायचं ते कळलं,त्यानंतर त्याची खरी इनींग सुरु झाली ती जिल्हा परिषदच्या राजकारणापासून.
जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर त्याच्यावर सभापती पदाची जबाबदारी आली,खरं तर नशिबानं कमी आणि राजकारणाच्या कुटील डावपेचामुळे त्याची जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी हुकली,संदीप च्या जागी कोणी दुसरा असता तर त्याने आकांडतांडव केलं असत मात्र एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे त्याने हा वार छातीवर झेलला आणि लोंकांच्या कामात स्वतःला झोकून देत त्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
असं म्हणतात की,
"ऊबड़ खाबड़ रस्ते भी, समतल हो सकते हैं,
कोशिश की जाए तो मुद्दे हल हो सकते हैं.
शर्त यही है कोई प्यासा हार न माने, तो
हर प्यासे की मुट्ठी मेँ बादल हो सकते है "
या प्रमाणे संदीप ने काम सुरु ठेवलं.आपण सर्वच लोक नेहमी राजकारण्यांबद्दल चांगली कमी आणि वाईटच चर्चा जास्त करतो मात्र त्यांच्या सोबत एक दिवस राहील तर त्यांना काय काय सहन कराव लागत हे मी अनेकदा संदीप बरोबर अनुभवलंय, कोणाची पोरगी नांदत नाही,तर कोणाची बायको सोडून गेलीय,कोणाचे बांधावरून भांडणं झालीयत तर कोणाला पोलिसांनी पकडलं आहे,एक ना अनेक तक्रारी कायम असतात त्या सगळ्या लोकांना मदत करायची त्यांच्या अडचणी सोडवायच्या,सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि कधी कधी झोपेतही लोकांची काम करायची,वैताग नुसता मात्र प्रत्येकाला हसून बोलावच लागत."राजकारणी हा अस्सल आणि खराखुरा अभिनेता असतो" असे मला  वाटत कारण दुःख असो की सुख त्याला चेहऱ्यावर दाखवायला परमिशन नसते,असच काहीसं संदीप च्या बाबतीत जाणवतं.
संदीप हा जेवढा डॅशिंग आहे तेवढाच तो संवेदनशील आणि कुटुंब वत्सल आहे हे मी अनेकदा अनुभवलंय,काही महिन्यांपूर्वीच त्याला सह कुटुंब फिरायला जायचे होते मात्र वेळच मिळत नव्हता तेव्हा बायको चा फोन आल्यानंतर त्याचा जो समजावून सांगण्याचा स्वर होता तो प्रत्येक कॉमन नवर्यासारखाच होता,बाप म्हणून देखील संदीप खूप इमोशनल आहे,मुलगा म्हणून त्याला वडीलांबद्दल वाटणारी काळजी मी कमालनयन  बजाज च्या मोकळ्या मैदानात त्याच्या डोळ्यात पाहिली आहे.
संदीप ला बोन्साय झाडं आणि प्राणी यांच्याबद्दल प्रचंड माहिती आहे हे बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं,कुत्रे,मांजर,साप, चिमण्या,घुबड,कावळे,कुठं मिळतात,त्यांची निगा कशी राखायची हे तो सांगत असताना मी फक्त ऐकत होतो,त्याला बंदूक ,पिस्टल याबद्दल देखील चांगलीच जाण असल्याचं पाहून मी आश्चर्य चकित झालो,
स्वतःच्या राहण्या,खाण्याबद्दल देखील संदीप फार चुझी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या या युवा नेत्याला आता आकाश पादाक्रांत करण्याची स्वप्न पडू लागली आहेत,कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारा हा माणूस आपल्या इमेज ला धक्का लागणार नाही याची देखील काळजी करत असल्याचं अनेकवेळा पाहिलं आहे,अलीकडच्या काळात आपल्या इमेज बिल्डिंग वर त्याने विशेष भर दिलाय हे विशेष.आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणालाही त्रास होणार नाही यासाठी संदीप स्वतः जातीनं लक्ष देत असल्याचं मी पाहिलंय, विशेष म्हणजे त्याने केवळ गॅंग जमा केली आहे हा समज दूर करण्याचा सातत्याने त्याच्याकडून प्रयत्न होताना अलीकडच्या काळात अनेकांनी पाहिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी संदीप च्या नेतृत्वाखाली शहरात साजरी झालेली शिवजयंती आज ही अनेकांच्या स्मरणात आहे,त्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने महिलांनी फेटे घालून सहभाग नोंदवला तो पाहता संदीप ची इमेज बदलली आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नक्कीच नाही.
कोणी तरी म्हटलं आहे की ,
"जिनकी बुनियादों में खट्टापन है, मत भूलो,
पकने पर सब के सब मीठे फल हो सकते हैं.
ये दुनिया इन्सानों की है थोड़ा  तो रुकिए,
पत्थर दिल वाले भी सब कोमल हो सकते हैं"
संदीप बाबत देखील असच म्हणावं लागेल,अनेक जण मी संदीप असा एकेरी उल्लेख करतो म्हणून भुवया उंचावतील मात्र तो माझा स्वभाव आहे,त्याला इलाज नाही,माझ्यापेक्षा संदीप ला जवळून ओळखणारे अनेक जण असतील मात्र मागच्या काही वर्षात त्याच्या बद्दल जे मला जाणवलं,जे समजलं,त्यातलं जेवढं मांडता येईल ते मी मांडल शेवटी म्हणतात ना ......
" सपनों के सच होने की तारीख नहीं होती,
आज न जो सच हो पाए वो कल हो सकते है
जीवन के हर पल को यूँ ही जीते चलिए बस, इनमें ही कुछ महके महके पल हो सकते है "
माझ्या या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,त्याच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी ईश्वर त्याला बळ देवो,त्याच्याकडून विधायक कामं होवोत याच शुभेच्छा .....!
लक्ष्मीकांत रुईकर,झी मीडिया ,बीड
9422744404.

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...