सोमवार, २५ जुलै, २०१६

स्वयमेव मृगेंद्रता .........!

स्वयमेव मृगेंद्रता.........!

साधारपणे चार पाच दिवसापूर्वी राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना भेटण्याचा योग आला,नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे महाराज येणार आहेत अस कळल्यानंतर तेथे जाऊन भेट घेतली,इतक्या दिवस महाराजांबद्दल फक्त ऐकून होतो,प्रत्यक्ष भेट चार पाच वेळा झाली होती,मात्र ती जुजबी अशीच होती,मात्र कोपर्डी येथे काहीशी निवांत भेट झाली,त्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा योग आला,तब्बल एक दीड तास वेगवेगळ्या विशेषतः शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली,त्यानंतर मनात विचार आला महाराजांची जी प्रतिमा आहे ती म्हणजे ते राजकीय गुरू आहेत त्यापेक्षा ते कितीतरी वेगळे आहेत,त्यांचा प्रत्येक क्षेत्रात गाढा अभ्यास आहे याची जाणीव झाली,अस कोणतंच क्षेत्र नाही ज्याची माहिती महाराजांना नाही,प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आणि अधिकारवाणीने बोलणं पाहून एका श्लोकाची आठवण झाली "नाभिषेको न संस्कारःसिहंस्य क्रियते नने । विक्रमार्जित सत्वस्य " 'स्वयमेव मृगेंद्रता '। अर्थात सिंहाला कोणत्याही अभिषेक किंवा संस्कार करून राजा हि उपाधी घेण्याची गरज पडत नाही कारण तो जंगलाचा अनभिषिक्त सम्राट हा आपल्या कार्यकौशल्यामुळे असतो,असच काहीस मला भय्यू महाराजांबद्दल जाणवलं .
आमचे मित्र डॉ सतीश लड्डा यांनी महाराज कोपर्डी ला येणार असल्याचं सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत रवाना झालो,साडेचार पाच वाजेपासून महाराजांची भेट होईल यासाठीची प्रतीक्षा तब्बल रात्री नऊ वाजता संपली, खरं तर एवढा वेळ लागल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो,कदाचित मी पत्रकार असल्यामुळे माझ्यातील इगो मला त्याची सातत्याने जाणीव करून देत असावा कारण एवढा वेळ कोणाची भेट घेण्यासाठी थांबणं आमच्या (पत्रकार )स्वभावात नाही,अगोदर आम्ही नंतर सगळे हाच आमचा आजपर्यंतचा समज त्यामुळे लागणारा वेळ असह्य होत होता,उद्विग्न करीत होता ,पण दुसर मन थांबण्यासाठी  आग्रह करीत होत, शेवटी थांबूया काही वेळ काय होईल थोडा उशीरच होईल मात्र भय्यूजींच्या भेटीचा योग् पुन्हा कधी येईल हे सांगता येणार नाही म्हणून थांबलो आणि एका विचारवंत,प्रकांड पंडित,सर्वगुणसंपन्न,माणुसकीचा झरा असणाऱ्या महान दैवी योगपुरुषाला भेटण्याची संधी मिळाली
येणारा प्रत्येक जण महाराजांना अडचण सांगत होता ते त्याच्याशी बोलतं होते,मी मात्र कुळधरन गावातील शाळेत कधी एकदा हा सगळा प्रकार थांबतो याचाच विचार करीत होतो,महाराज कर्जत येथे निवांत भेटतील अस कळल्यानंतर आम्ही कर्जत ला गेलो,मात्र तेथेही गर्दी असल्यामुळे न भेटताच जावे असा विचार केला पण डॉ लड्डा याना महाराजांशी बोलायचे होते त्यामुळे थांबावे लागले मात्र महाराजांची भेट झाली आणि थकवा ,निराशा कुठल्या कुठे दूर पळून गेली,किती लोकांना तुम्ही इंटरटेन करता,जरा तब्येतीची काळजी घ्या,लोकांना समस्या कायम राहणारच आहेत मात्र आपल्याही काही मर्यादा आहेत अस त्यांना सांगावं असा विचार एकदा मनात आला मात्र त्यांची भेट झाल्यानंतर सगळं विसरून त्यांच्याशी बोलण्यात किती आणि कसा वेळ गेला ते कळलेच नाही,महाराज कर्जत येथे एका भक्ताच्या घरी गेले तेव्हा श्रीकांत चव्हाण यांनी माझी ओळख करून दिली,महाराजांनी सहजपणे वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली ते गेल्याचं सांगितल्यानंतर गंभीर होत महाराजांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
कोपर्डीच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत अशा घटना का घडतात त्या कशा रोखता येतील,समाजाने काय केले पाहिजे,महिलांच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या विषयावर ते भरभरून बोलत होते,महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दल स्थापन करण्याचा त्यांचा विचार आणि तळमळ यातून ते किती कोमल मनाचे आहेत याची जाणीव झाली.
आज पर्यंत महाराजांचा एकच चेहरा जगासमोर होता तो म्हणजे ते राजकीय गुरू आहेत,राजकारणी लोकांचा,उद्योजकांचा त्यांच्याकडे मोठा राबता असतो,ते अनाथ ,निराधार मुले,महिला यांच्यासाठी सेवाव्रतीने कार्य करतात,मात्र एवढ्या सगळ्या धावपळीत ते महिलांच्या सुरक्षेबाबत इतके जागरूक असतील याची कल्पना नव्हती,कोपर्डी येथे त्यांनी दोन बस मुलींना शाळेत ने आण करण्यासाठी दिल्या,या बस मध्ये सीसीटीव्ही ,हजेरी रजिस्टर,मोबाईल,अलार्म अशा सुविधा दिल्या आहेत, दोन बस त्यांनी बीड साठी दिल्याचं देखील आवर्जून सांगितलं आणि त्यांचं बीडवर किती बारीक लक्ष आहे हे लक्षात आलं.
कोपर्डी घटनेवर  चर्चा झाल्यानंतर  मीच त्यांना शेतीचा विषय काढला,दिवसभर हजारो लोकांना भेटून ते काहीशे थकले होते,त्यांना नगर ला जाऊन आराम करायचा होता मात्र शेतीचा विषय निघाला आणि महाराजांची पावलं थबकली,बीड जिल्ह्यातील शेती,शेतकरी,त्याच जीवनमान या विषयावर ते पोटतिडकीने बोलत होते,बीडसह मराठवाड्यात रासायनिक खताचा अतिरेकी वापर झाल्याने तेथील जमीन नापीक झाली आहे,कापूस आणि ऊस या दोनच पिकांवर शेतकऱ्याचा भर असल्याने इतर पिकं तो घेत नाही,त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे तो सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुधारण्यासाठी पुढील नऊ वर्ष परिश्रम घ्यावे लागतील हे सांगतांना त्यांची बळीराजसाठीची तळमळ दिसून आली.
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्याबरोबरच रासायनिक खतांचा अति वापर थांबला पाहिजे यासाठी काय करता येईल याची चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती,शासन शेतकऱ्याला ठिबक सिंचनासाठी अनुदान देत मात्र त्यात शेतकरी कसा नागवला जातो आणि बँकांचे उखळ कसे पांढरे होते हे त्यांनी उदाहरण देऊन पटवून दिले तेव्हा मी अचंबित झालो,ठिबक सिंचन असो कि पीक कर्ज वाटप यामध्ये शेतकरी कसा भरडला जातो हे त्यांनी सांगितल्यानंतर आश्चर्य वाटले,त्यांच्या बोलण्यातून सरकार,त्यातील सत्ताधारी,प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल अपेक्षाभंगाचं दुःख दिसून आलं,सत्ता कोणाची असो शेतकर्याच्या आयुष्यात काही फरक पडत नाही त्यामुळेच आपण  मध्यंतरी सगळं सोडून देण्याचा विचार केल्याच त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितलं आणि मनात कालवा कालव झाली,महाराज लोकांना देखील दुःख ,चिंता,निराशा असते याचा अनुभव आला,
     दरम्यान आता शेती आणि शेतकरी याविषयावर  ते विचार करत असून शाश्वत शेती कशी करता येईल यासाठी पुढाकार घेण्याचं त्यांनी सांगितलं आणि मनाला बरं वाटलं .
गावगावांचा अभ्यास करून तेथील जमिनीमध्ये कोणती पीकं घेता येऊ शकतात,त्यासाठी कोणती खत आवश्यक आहेत,गटशेती केली तर काय फायदा होईल याविषयावर त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता,महाराज म्हणजे लोकांना पाया पडून दक्षिणा घेऊन आशीर्वाद देणारा असा माणूस हे भय्यू जी बरोबर चर्चा केल्यानंतर खोटे वाटते.हे विश्वचि माझे घर हि ज्ञानोबा माउलींची संकलपना महाराज सत्यात आणत असल्याची जाणीव नक्कीच होते,त्यांना सर्वसामान्य माणूस,त्याच्या अडचणी  त्यावरील उपाय याबाबत किती आपुलकी चिंता आहे हे दिसत होते .
महाराज केवळ राजकीय गुरू नाहीत तर ते जगाच्या कल्याणाची चिंता वाहणारे आहेत याची त्या दिवशी खात्री पटली, म्हणजे मी काही त्यांचं मूल्यमापन करणारा नाही किंवा ती माझी पात्रता देखील नाही परंतु जे जाणवलं ते मी मांडल, "उद्योगमं, साहसम, धैर्यमं, बुद्धिहीं, शक्ती,पराक्रमः,षडेते यत्र वर्तन्ते,तत्र देव सहायकृत " ,अस जे म्हणतात ते भय्यूजींच्या सारख्या पुण्यशील व्यक्ती बद्दलच असावे यावर शिक्कामोर्तब झाले.त्यांचं हे कार्य असच अखण्डपणे सुरु राहावे यासाठी ईश्वर त्यांना बळ देतोच आहे यात शन्का नाही मात्र समाजानेही त्यांच्या या राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहभाग घ्यावा एवढीच माफक अपेक्षा .
लक्ष्मीकांत रुईकर,बीड.9422744404.

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...