शुक्रवार, २८ जुलै, २०१७

सवत रंडकी झाली .....!

सवत रंडकी झाली .......!

एखादा माणूस जर ऐकत नसेल तर त्याचा नाद सोडून आपली वाटचाल करावी हा साधा संकेत आहे,बिहार मध्येही काहीसे असेच घडले,भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लालूपुत्र तेजस्वी यादव हे स्वतःहून राजीनामा देतील अशी नितेश कुमार यांची अटकल होती मात्र तेजस्वी काही मागे हटत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर नितीश यांनीच पुढाकार घेतला अन तेजस्वी यांना मंत्रिमंडळातून काढण्याची रिस्क घेण्याऐवजी त्यांनी स्वतःहून राजीनामा देणे पसंत केले.या माध्यमातून त्यांनी एका फटक्यात सगळं चित्रच पालटून टाकलं.आपलं ऐकलं जात नाही म्हटल्यावर त्यांनी राजीनामा देऊन " हम तो डुबेंगे सनम पर तुमको भी लेके " असा कारभार करत नवरा मेल्याच दुःख न करता सवत रंडकी करून मोकळे झाले.

2014 मध्ये गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झाला अन नितीश यांच्यासारखे अनेक काजवे अचानक लुप्त झाले,मोदी यांच्या सुनामी मध्ये 70 वर्ष देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस ची पाळंमुळं हलली नव्हे मुळापासून उपटली गेली,लालू,ममता,पवार यांच्यासारखे दिगग्ज भुईसपाट झाले.मोदी सुनामी एवढी मोठी होती की तीन वर्षानंतर ही आज देखील विरोधी पक्ष सुन्न आहे.

मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने तीन वर्षात तब्बल अठरा राज्यात आपली घोडदौड कायम ठेवली.जिथे स्वबळावर शक्य आहे तिथे स्वबळावर नाहीतर मित्रपक्षांना सोबत घेत भाजप ने म्हणजेच मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने देश पादाक्रांत करण्याचा विडा यशस्वी करून दाखवला.मोदी यांना टक्कर देऊ शकेल असा नेता विरोधकांकडे नसताना सगळेच नितीश कुमार यांच्याकडे कडवे मोदी विरोधक म्हणून पाहत होते.
बिहार मध्ये झालेल्या निवडणुकीत नितीश यांनी मोदींचा चौखूर उधळलेल्या वारू रोखला आणि विरोधकांच्या स्वप्नांना बळ मिळाले.नितीश हे देशाच्या राजकीय पटलावर मोदींना विरोध करू शकतात अशी आशा निर्माण झाली.नितीश यांच्या डीएनए मध्ये काहीतरी वेगळं आहे याचा साक्षात्कार विरोधकांना झाला,मात्र वर्षभरापूर्वी विरोधकांच्या फुग्यातील हवा नितीश यांनी नोटबंदी,सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्यावर मोदींना साथ देत काढून घेतली,तेव्हापासून च नितीश हे मोदी यांच्या जवळ जात असल्याचे दिसत होते मात्र मरता क्या न करता या पद्धतीने विरोधकांना अजूनही नितीश यांच्याकडून आशा होती.

दरम्यान लालुचे दिवटे चिरंजीव तेजस्वी यांचा असा काही प्रकाश भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पडला की समाजवादी विचारधारा असणारे नितीश कुमार अस्वस्थ झाले.लालू पुत्र स्वतःहून राजीनामा देतील अशी भाबडी आशा नितीश यांना होती मात्र संधीच एऑन सोनं करतील तर लालू कसले त्यांनी नितीश यांच्यावरच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.तेजस्वी यांच्यावरील आरोप खोटे असून ते राजीनामा देणार नाहीत नितीश यांनीच काय तो निर्णय घ्यावा अशी भूमिका लालू यांनी घेतली.त्यानंतर मात्र नितीश यांनी  डाव टाकला,तेजस्वी हर राजीनामा देत नाहीत त्यांना काढले तर सरकार अल्पमतात जाऊ शकते या सर्व शक्यता पडताळून पहात त्यांनी स्वतःहून राजीनामा देत सगळ्यांनाच धक्का दिला.या राजकीय भूकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की त्यात लालू राज तर उध्वस्त झालेच पण काँग्रेस अजूनही कोमातून बाहेर येऊ शकलेली नाही.

नितीश असा काही निर्णय घेतली अशी कोणालाच अपेक्षा नव्हती मात्र या सगळ्या खेळीचे जे जनक होते ते मोदी शहा मात्र पडद्याआडून सगळं शांत पणे पहात होते,गेल्या वीस महिन्यापासून जो डाव मोदी शहा जोडीने टाकला होता त्यात त्यांना यश आले.शिकारी खुद् यांहा शिकार बन गया अशी काहीशी अवस्था नितीश यांची झाली.

वर्षभरापासून मोदी यांच्याशी नितीश यांची वाढलेली जवळीक अखेर फळाला आली,एका रात्रीत राजीनामा आणि पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ हे फक्त बिहार मध्येच होऊ शकते,राजीनामा देताना किंवा भाजपशी हातमिळवणी करताना नितीश कुमार यांनी स्वपक्षीय लोकांना देखील विश्वासात घेतले नाही.अवघ्या पंधरा तासात नितीश यांनी हिट विकेट होत लालूपुत्र तेजस्वी यांची विकेट घेतली,तसेच काँग्रेस ला मैदानाबाहेर फेकले आणि वीस महिन्यापासून बौन्ड्रीवर असणाऱ्या भाजपला टीम मध्ये घेत सगळी गणित बिघडवून टाकली.

नितीश यांनी बिहार मध्ये जो भूकंप घडविला त्याचे धक्के महाराष्ट्रात देखील बसल्याचे चित्र आहे,नितीश यांच्या धक्क्या अगोदर दोन दिवस देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खुर्चीला अदृश्य हात मदत करतील असे सांगितले होते यावरूनच सगळे लक्षात येते.मोदी शहा यांची जोडगोळी किती चाणाक्ष आहे याचा नमुना बिहारमुळे सगळ्यांनाच लक्षात आला असेल त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची भाषा करणारे आणि राजीनामे खिशात घेऊन फिरणारे काही दिवस तरी शांत होतील हे नक्की.

लक्ष्मीकांत रुईकर,बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

दसरा (मनातील)काढून तर बघा !

  दसरा (मनातला)काढून तर बघा ! सण वार,कार्यक्रम,पूजा या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्याचा उत्साह आपल्या सर्वानाच असतो,विशेषतः श्रावण महिन्यापास...